लातूर : 10 मार्च 2024
महाराष्ट्र राज्य बहूजन शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष मा. गौतमजी टाकळीकर यांचा दि. 10 मार्च रोजी विविध संघटनांच्या वतीने साजरा करण्यात आला.
प्रथम आज सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, तद्नंतर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन, संस्थापक अध्यक्ष मा. एस. आर कांबळे सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु झाला.
या कार्यक्रमाला बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबळे, शिवाजी पात्रे शिक्षक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. केशव गंभीरे सर, शिक्षक समिती तथा पतसंस्था संचालक मा. गणेश गायकवाड सर, अहमदपूर ता. सचिव तथा पतसंस्था संचालक मा. संजय पवार सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाउपाध्यक्ष मा. विनोद नागटिळक, राज्यप्रसिध्दी प्रमुख मा. गणेश सावळकर, जिल्हाउपाध्यक्ष मा. संभाजी गुळवे, शिक्षक समितीचे नेते मा. गणेश गायकवाड, संचालक मा. संजय पवार, राज्य उपाध्यक्ष मा. मधुकर सोनवणे, जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे, आदि मान्यवरांनी टाकळीकर साहेबांविषयी त्यांचे कार्य, कर्तुत्व, शाळा, शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, अध्यापन, प्रशासन, शासन, संघटना कुटुंब शिक्षक हित सर्वांगाने त्यांच्या कार्याला आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
वाढदिवसानिमित्त केशव गंभीरे सर, गणेश गायकवाड सर, मधुकर सोनवणे सर, सिध्दार्थ सोमवंशी सर दिलीप पाटिल सर, गणेश सावळकर सर, जाकिर शेख सर, संभाजी गुळवे सर, मादळे डी. एस. किशोर शिंदे, शिवाजी पात्रे दिनेश कांबळे, यांनी शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ, केक कापून, "कायद्याच्या, लोकशाहीच्या देशातील सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लेखणी" देऊन वाढदिवस साजरा केला.
यानंतर नुतन संचालक मा. गणेश गायकवाड निलंगा पतसंस्था, संजय पवार अहमदपूर पतसंस्था, नुतन मुख्याध्यापक रणखांब सर, कदम सर यांचा बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तद्नंतर वाढदिवस सत्कार
कार्यक्रमाला उत्तरादाखल मा. गौतमजी टाकळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. आयुष्याची सुरवात, भोगलेली गरिबी, संघटनेचं बिज रोऊन वटवृक्षाप्रमाणे केलेला विस्तार, त्यासाठीचा त्याग, तळमळ, धडपड, तसेच अधिकारी, संघटना, समाजकारण, राजकारण, कुटुंब व उत्तरदायित्व याविषयी सखोल मनोगत व्यक्त केले व आभार न मानता सर्वांच्या ऋणातच राहणे पसंत करत उपस्थितांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_---_-_-_-_---_-_-_-_-_-_-_-_-_-_-
बौध्द धम्मातील मुले व मुलींची नावे
बौद्ध धर्मातील मुलामुलींची नावे मुलींची नावे :
अ –
अमिता, आम्रपाली, अभिरुपनंदा, अभिरुपा, अनुपमा, अनुराधा, आरती, अरुणा, अलका, अर्चना, आनंदी, आज्ञाधारी, आज्ञा, अनुप्रिया, अनिता, अजंठा, आशा, अंजली, अंजना, अंनला, आर्या, आर्यकुमारी, अंजनी, अश्विनी, अस्तिमा, अनुजा, आकांक्षा, आर्श्वया, आतिमा, अंकिता, अंबत्तिका, अनुशीलता, अनुशीला, अनुसया, अमृता, अपर्णा, अंतिमा, अनंतश्वरी, अपराजीता, अनुजा, अक्षता, अक्षरा, आषाढी, अभिजिता, अनामिका.
आ – आनंदी, आश्विनी, आनोमा, आश्वमेधा, अचिरावती, आम्रपाली, आढलेश, आशालता.
क – करुणा, कमलशीला, कल्याणी, कल्पना, कामना, कुसुम, कुंडलकेशी, कुशीनरा, कुमारदेवी, कमल, कन्याकुमारी, कार्तिकी, कमलपुष्पा, कमलावती, कमलनयना, क्रांती,कांचन, किर्ती, किरण, कलावती, कंचन, कावेरी, कविता, कंचनलता, कांता, कनिष्ठा, कामिनी, कोमल, कक्षा, काजल, किसागौतमी, कौशल्या, कस्तुरी, कुददिपा, कपिला, कमलांक्षनी.
ख – खेमा, खजुतरा.
ग – गौतमी, गुणप्रिया, गुणवत्ता, गुणशीलता, गुणप्रभा, गुणरत्ना, गंगा, गुणलता, गिता, गितांजली, गौरी, गायत्री, गर्जना.
च – चंद्रशीला, चंद्रप्रभा, चंद्रकिरण, चाला चित्रा, चारिका, चंपावली, चारुशीला, चेतना, चारुमती, चैताली, चंद्रकला, चंपा, चित्रलेखा, चमेली, चंदेरी, चंद्रा, चंद्ररत्ना, चंद्रदिपा, चंद्रमुखी, चंद्रकांता, चंद्राक्षनी, चंद्राक्षा.
छ – छाया, छकुली, छब्बीता, छयेशा, छविना, छायाक्षी, छायांती.
ज – जया, जल, जयललिता, जयश्री, जयेश्वरी, जयेश्वर्या, जेनकुमारी, जयेत जोत्स्ना, जयवंती, जानकी, जयशीला, जयाक्षनी, जयनंदनी, जयनंदा, जुही, जयकुमारी, जेतवन, जानवी, जागृती.
त – तक्षशीला, तेजस्वीता, तृष्णा, तृप्ती, तारा तलीनी, तारिका, तेजस्विनी तिष्या, तिष्यांकामना, तिष्यरक्षिता.
त्र – त्रिशीला, त्रिरश्मी, त्रिरत्ना, त्रिनेजा, त्रिनयना.
द – दिक्षा, दर्शना, दानपुत्री, देवप्रिया, दंतिका, दामिनी, दिव्या, दिव्यांनी, दिव्यश्वरी, दिपा दिपीका, दिपरत्ना, दिपशीला, दिपाली, दिशा, दानपुत्री, दानपाली, देविना, देविका, दिपमाला, दक्षिना, दया, दर्पना, दिपशीला, दमयंती.
ध – धम्मज्योती, धम्मदिना, धम्मपुत्री, धम्मप्रेमी, धम्मधिरा, धम्मशीला, धम्मप्रिया, धम्मनेत्री, धम्मसेनानी, धिरा, धम्मपाली, धनपुत्री, धनकुमारी, धनरत्ना, धनशीला, धम्मप्रेमिका, धम्मदिक्षा, धम्मांजली, धम्मश्वरी, धम्मप्रणाली, धम्मक्रांती, धम्मप्रेरणा, धम्माक्षनी, धम्मनंदा, धम्मकामना, धम्मदर्शना.
ब – बुद्धप्रणाली, बुद्धपुत्री, बुद्धराणी, बुद्धलीला, बुद्धशाली, बुद्धरत्ना, बुद्धप्रभा, बुद्धांजली, बुद्धप्रिया, बाला.
म – महामाया, मायावत, मायादेवी, ममता, मिरा, मिगारमाता, मृगनयनी, मिनाक्षी, मनिषा, मिना, मिता, महाराणी, मनोरमा, मालिनी, मुक्ता, मालती, मनोकामना, मैत्रायणी, मधुशीला, महानंदा, महानंदा, माधुरी, मंगल, मंजरी, मेघा, मेघगर्जना, माया, मधुवती, मधु, मधुबाला, मिनल, मानसी, मनाली, मंदा, मयुरी, मंजुशा, मंजिरी, मंजू, मोनिका, मेनका, मोहिनी, मौसमी, मंजुश्री, मित्तली, मेघना, माधवी, मायश्वरी, मायाक्षी, मधुरत्न, मणिरत्ना, मिक्रांती मयुरी.
र – रोहिणी, रमा, रत्नमाला, रत्नपाली, रंजना, राजकुमारी, राजश्री, राजक्षी, रत्नदिपा, रागिणी, रविना, रिना, रेखा, रत्नसुंदरी, रत्नप्रभा, रत्नशीला, रक्षिता, रत्नज्योती, राखी, राणी, रिटा, रिता, रेणू, रक्षा, रिंकु रत्ना, रेश्मा, रितीका, राजनंदीनी.
रु – रुपाणी, रमाई, रुपा, रुपमाला, रुपेर, रुपनंदा, रुशाली, रुशीता.
ल – ललिता, लिली, लिला, लिलावती, लिलांकी, लिलाश्वरी, लिलकांती, लता, ललिन, लेखा, लिकिता, लुम्बिनी, लिलावती.
न – नालंदा, नागराणी, निर्मला, नंदिनी, नागपुत्री, नंदकुमारी, निरंजना, नंदिनी, निलाक्षी, निलिमा, निलम, निलकुमारी, लकुलकुमारी, नायिका, निशा, निमा, निता, निकिता, निला, नेहा, नयना, नम्रता, निविदा, निलांबरी, निकांती, निलेश्वरी, निलांजनी, निलांजली, नंदा.
प्र – पारमिता, पुनम, पुर्णा, पौर्णिमा, पुष्पा, पुष्पांजली, पुर्णिका, पद्मा, पद्मावती, पाली, पियुषा, पंचशीला, पिना, पारमी, पुजा, पुणिका, प्रेरणा, परिवर्तना.
भ – भिमाई, भिमपुतरी, भिमकुमारी, भिमराणी, भिमज्योती, भिमस्मृती, भिमांजनी, भाविका, भावना, भाग्यश्री, भाग्यशाली, भागयरत्ना, भाग्यशीला, भाग्यवंती, भाग्यरती, भाविना.
ऋ – ऋतुला, ऋतुशा, ऋताक्षी, ऋतुशीला, ऋतुशाली.
वि – विशाखा, विद्या, विनयधारी, वैशाली, वजिरा, वाणी, विनीता, विजया, विजयानंदा, वैजंती, वैशाखी, विनायिका, वैश्यु, वनमाला, वंदा, विमल, वैभवशाली, विक्रमा, विक्रांती, विश्रांती, विक्रमशीला, विक्रमशाली, विनाक्षी, विपश्यना.
श – शीला, शितल, संघप्रिया, सुवर्णा, सुवर्णमाला, सुमिता, सुनीता, सेमता, स्मृती, स्मिता, समाधी, संघनी, सुप्रभार, सुलक्षना, सुमित्रा, सायली, सत्यशीला, सत्यशाली, सुरेखा, सुनंदा, सुंगधा, सुशीला, सुमन, सरिता, सविता, सुषमा, सरोजा, सीमा, सरला, सरस्वती, साधना, संगीता, सया, संघदिपा, सुवासिनी, स्मृती, स्वाती, संजिवनी, सुलोचना, सुलाक्षी, स्वप्नाली, संचिता, संकिता, सांची, सम्राज्ञी, सुष्मिता, सुप्रणा, सुपर्णा, सदिच्छा, सारीका, सुश्रुषा, सुमनांजली, सुमेनांजनी, सुकिता, सती, सोनम, सोनाली, सोनेरी, सरोजिनी, सुहासिनी, सुकेशिनी.
उ – उर्मिला, उरवेला, उरवेशा, उराक्षी, उर्मि, उत्तरा, उरमित, उषा, उमा, अत्पलवर्णा. मुलांची नावे
-----------—---------------------------------------------------------
अ – अभिमन्यु, अमितोधन, अपुर्व, अशिश, आदित्य, अरविंद, अंजन, असित, अजिंक्य, अजातशत्रु, अशोक, अजय, अनिरुद्ध अलंकार, आशुतोष, अंकुश, अमित, अमोल, अनिल, अविजित, आकाश, आयुपाल, अविनाश, अक्षय, अश्वजित, आरीरा, अमर, अगिरस, अग्निदत्त, आदेश, आनंद, अभय, अजित, अमेश, अमरेद्रकुमार, अमररत्न, अमृत, अमृताचंद, अश्वघोष, अहिंसक, आर्यनंद, आर्यसेन, आर्यनरेश, आर्यदेव, अजपाल, अजितसेन, आर्यनरेश, अश्वमेघ, आर्यपुत्र, आलामकालाम, आर्यमित्र, अंगीरस, आनंदकिर्ती, अमिताभ, अमरचंद्र, आनाथमित्र, आलोक, अश्वशील, अंगुलीमाल, आनाथपिण्डक, अर्हन्त, आवाहन, अलंकार, अशिश, आशुतोश, आदर्श, अमरदिप, अनंत, अंकित, अर्शद, ओंकार, अभिजीत, अभिनव, अंकुर, अबोध, अतूल.
इ – इंद्रगुप्त, इद्रंदित्य, इंद्रजित, इंद्रसेन, इंद्रमित्र, इंद्रकुमार, इंद्रवर्धन.
ग – गुणरत्न, गुणानंद, गुणसेन, गुणवर्धन, गुणवंत, गुणसागर, गुणानंत, गुणकुमार, गौतम, गौतमानंद, गौरव, गोवर्धन, गुलशन, गुरुधम्मा, गुणप्रभा.
च – चक्रधर, चक्रवती, चंद्रगुप्त, चंद्रसेन, चंद्रराज, चंद्रमणी, चंद्रबोधी, चंद्रशेखर, चित्रसेन, चंद्रबंधु, चंद्रकांत, चंद्रशील, चैतन्य, चेतक, चेतन, चैत्यकुमार, चैत्यानंद.
ज – ज्योतीपाल, जलपाल, जयानंद, जयप्रकाश, जयसेन, जयन, जीवक, जयवर्धन, जगन, जयमित्र, जयानंत, जयवंत, जितेश, जितेंद्र, जीवन, जय, जयरत्न, जयदिव, जेतनकुमार, जतिन, जयंत.
त – तथागत, तुषार, तिष्यकुमार, तिष्यमित्र, तिष्यसेन, तिष्यानंद, तिष्यानंत, त्रिरत्न, तिस्स, त्रिनेत्र, त्रिदिप, तहंकर, तेजस, तेस, तेजस्वी, तिलोक.
द – दानपाल, दानज्योतस, दानरत्न, दानदिप, दानवंत, दानसेन, दानवीर, दिपकर, देवदत्त, दंडपाणी, देवेंद्र, देवपाल, दानशुर, देवानंद, देविदास, देषप्रीय, दायक, दानप्रकाश, दानप्रिय, दानसागर, दानबोधी, दिपक, दिलीप, दिनकर, दिनेश, दर्पन, दर्शन.
ध – धम्मसेवक, धम्मपाल, धम्मदुत, धम्मप्रकाश, धम्मशील, धम्मविनय, धम्ममित्र, धम्मज्योत, धम्मसागर, धम्मभुषण, धम्ममित्र, धम्मदर्शी, धम्मघोष, धम्मकिरण, धम्मपुत्र, धम्मानंद, धम्मनंत, धम्मरत्न, धम्मज्ञान, धम्मबोधी, धम्मकिती, धम्मधर, धम्मरक्षित, धम्मप्रिय, धरमेंद्र.
न – नागासेन, नंदवर्धन, नंदसेन, नागवर्धन, नागानंद, नागार्जुन, नागेश, नंदेश, नंदकुमार, नरेश, नंदेश, नंदकुमार, नागधम्मो, नागदत्त, नागघोष, नागरत्न, नागबंध, नागप्रिय, नरेंद्र, नरसिंह, नोगपाल, नागराज, नागेंद्र, नंद, नरदत्त, नितीन, निलेश्वरा, निलकांत, निलकंठ, निलराज, निशिकांत, नविन, नवचैतन्य, निखिल, नलेंद्र, निलेंद्र, नयन, निलवंत, निवृत्ती.
प्र – प्रियदर्शी, प्रसेनजित, प्रसन्नकुमार, प्रज्ञानंद, प्रज्ञावंत प्रशांत, प्रमोद, प्रज्ञापुत्र, प्रज्ञाकुमार, प्रदिप, प्रविण, प्रफुल्ल, प्रकाश, प्रल्हाद, प्रतिक, प्रभाकर, प्रमित, प्रमेश, प्रतिकार, प्रणालय, प्रताप, प्रभारत्न, प्राणज्योत, प्रज्ञानंद, प्रज्ञानंत, प्रज्ञारत्न, प्रेमानंद, प्रेमेपाल, प्रेम, प्रसाद, प्रितम, प्रियरत्न, प्रणीव, प्रणव.
ब – बुद्धघोष, बुद्धप्रिय, बुद्धपाल, बोधानंद, बुद्धरत्न, बुद्धसंदेश, बोधीधम्म, बोधीपाल, बोधमृत, बालमित्र, बलभिम, बौद्धिक, बोधी, बुद्धादिप, बोधीप्रिय, बोधीराज, बुद्धसागर, बुद्धभुषण, बुद्धकिर्ती, बोधीसत्व, बोधीमित्र, बुद्धक्षित, बद्धांकु, बुद्धसेन, बुद्धपुत्र, बुद्धकुमार, बुद्धमान, बुद्धप्रणित, बुद्धशक्ती, बुद्धप्रकाश, बुद्धज्ञान, बुद्धज्योत.
भ – भिमराव, भिमसेन, भिमदास, भिमपुत्र, भद्रसेन, भारद्वाज, भारत, भारतरत्न, भिष्म, भिमकुमार, भिमशक्ती, भिमप्रकाश, भिमवीर, भिमप्रिय, भिमज्योत, भिमरत्न, भिमशांत, भिमसागर, भिमानंद, भिमपाल, भिममित्र, भिमराज, भिमअमृत.
म – मिलिंद, महेंद्र, महानाम, महादय, मंगलबोधी, मोगल्यायान, मणिकिर्ती, महाकारुणीक, महेश, महाकाश्यप, मंगेश, मंगलकिर्ती, मंगलराज, मुकेश, माणिक, मंगलराज, मणिरत्न, मोहन, मेत्तानंद, मितेश, मित्तकुमार, मोहर, मधुराज, मधुकर, मंगल, मकुल, मृणल, मधुर, मणेश, मनीष, मोहीन, मेघगर्जना, मेघानंद, मित्तल.
य – रत्नदिप, रत्नबोधी, रत्नपाल, राजरत्न, रमेश, राजकिरण, राष्ट्रपाल, राजदत्त, राजेंद्र, राजेश, राजू, राजपुत्र, रेवत, रोहित, रोहन, रवि, रविंद्र, राज, राजमित्र, राजभूषण, राजपाल, राजानंद, रत्नकिर्ती, राजगृह, रागेश, रितेश, ऋतू, राकेश, रविराज, रविराज, रमाकांत, राहुल, रुपेश, रंधिर, रतन, रोनंक, राजन, रजनी, रजनिकांत, निशी, रोहिन, रंजित.
व – विजयानंद, विकास, विनजय, विजयकुमार, विनायक, विभिषेक, विजेंद्र, विरेंद्र, विरेश, विनयबोधी, विमलकिर्ती, विमलसेन, वीरसेन, विनयवात्सलयान, विशुद्धांनद, विवेक, विद्यपाल, विलास, विनोद, विशांत, विद्यानंद, विनाश, विक्की, विरकुमार, विश्वदीप, विश्वरत्न, वैभव, विराट, विक्रांत, विधान, विक्रम, विनोद, विमलकुमार, वामन, विद्यारत्न.
श – शरणानंद, शरणंकर, शांतीदुत, शांतीदुत, शांतीभद्र, शांतीरक्षित, शीतेश, शैलेश, शांतीशील, शांतीबोधी, शांतीप्रिय, शांतीपाल, शैलेंद्र, शुद्धोधन, शरद, शाक्यकुमार, शाक्यसिंह, शुभम, शशीकांत, शशी, शशीकुमार, शशांक, शिशुपाल, श्वेत, शिल्पकार, शत्रुघ्न, शालिक.
स – सिद्धार्थ, सुमेध, सुमेधबोधी, सुप्रबुद्ध, सुदत्त, सुगत, सुधीर, सुरज, सुमित, सुकेश, सुयश सुमित्र, सुरज, सुनित, सुनिल, सुमंगल, सुबोधी, सुभद्र, सुशील, सुभद्रशील, सुभद्रबोधी, सुरेश, संचित, सुर्यसेन, सुविनय, सुजात, सुगतानंद, सविनाय, सुनानंद, संघरत्न, संघबोधी, संघबोधी, संघपाल, संघानंद, सिंहसेन, सिंहपुत्र, सिंहकुमार, सरनानंद, सत्यदर्शी, सत्यबोधी, सत्यपाल, सत्यदिप, सत्यानंद, सत्यरत्न, सावन, सावंत, सुबोध, सुधम्म, सुसंगत, सतिश, सदानंद, सचिन, सचेत, सारिपुत्र, संदेश, संदिप, सुर्यकांत, संघसेन, सधम्म, सदधम्म, संघमित्र, सुदामा, संग्राम, संघर्ष, सागर, संकेत, सोमेश, सुभाष, सुरेंद्र, सनी, सुर्यास्त, सुजान, सज्जन, सौरभ, सारनाथ, सिदेश, सिद्धांत, सुदिप, सुरत्न, संकेत.
क – करुणानंद, करुणाकिर्ती, किर्तीपाल, कनिष्क, कंथक, कमलेश, कमलाकर, कल्पेश, कल्पक, किरण, किशोर, कौषिक, कपील, कुलदीप, कमलानंद, करण, करुणाकर, कुणाल, करुणादिप, करुणाबोधी, करुणारत्न, करुणावंत, कमलशिल, केतन. उ – उमेश, उत्पल, उरूण, उत्तर, उर्वेश.
अ –
अमिता, आम्रपाली, अभिरुपनंदा, अभिरुपा, अनुपमा, अनुराधा, आरती, अरुणा, अलका, अर्चना, आनंदी, आज्ञाधारी, आज्ञा, अनुप्रिया, अनिता, अजंठा, आशा, अंजली, अंजना, अंनला, आर्या, आर्यकुमारी, अंजनी, अश्विनी, अस्तिमा, अनुजा, आकांक्षा, आर्श्वया, आतिमा, अंकिता, अंबत्तिका, अनुशीलता, अनुशीला, अनुसया, अमृता, अपर्णा, अंतिमा, अनंतश्वरी, अपराजीता, अनुजा, अक्षता, अक्षरा, आषाढी, अभिजिता, अनामिका.
आ – आनंदी, आश्विनी, आनोमा, आश्वमेधा, अचिरावती, आम्रपाली, आढलेश, आशालता.
क – करुणा, कमलशीला, कल्याणी, कल्पना, कामना, कुसुम, कुंडलकेशी, कुशीनरा, कुमारदेवी, कमल, कन्याकुमारी, कार्तिकी, कमलपुष्पा, कमलावती, कमलनयना, क्रांती,कांचन, किर्ती, किरण, कलावती, कंचन, कावेरी, कविता, कंचनलता, कांता, कनिष्ठा, कामिनी, कोमल, कक्षा, काजल, किसागौतमी, कौशल्या, कस्तुरी, कुददिपा, कपिला, कमलांक्षनी.
ख – खेमा, खजुतरा.
ग – गौतमी, गुणप्रिया, गुणवत्ता, गुणशीलता, गुणप्रभा, गुणरत्ना, गंगा, गुणलता, गिता, गितांजली, गौरी, गायत्री, गर्जना.
च – चंद्रशीला, चंद्रप्रभा, चंद्रकिरण, चाला चित्रा, चारिका, चंपावली, चारुशीला, चेतना, चारुमती, चैताली, चंद्रकला, चंपा, चित्रलेखा, चमेली, चंदेरी, चंद्रा, चंद्ररत्ना, चंद्रदिपा, चंद्रमुखी, चंद्रकांता, चंद्राक्षनी, चंद्राक्षा.
छ – छाया, छकुली, छब्बीता, छयेशा, छविना, छायाक्षी, छायांती.
ज – जया, जल, जयललिता, जयश्री, जयेश्वरी, जयेश्वर्या, जेनकुमारी, जयेत जोत्स्ना, जयवंती, जानकी, जयशीला, जयाक्षनी, जयनंदनी, जयनंदा, जुही, जयकुमारी, जेतवन, जानवी, जागृती.
त – तक्षशीला, तेजस्वीता, तृष्णा, तृप्ती, तारा तलीनी, तारिका, तेजस्विनी तिष्या, तिष्यांकामना, तिष्यरक्षिता.
त्र – त्रिशीला, त्रिरश्मी, त्रिरत्ना, त्रिनेजा, त्रिनयना.
द – दिक्षा, दर्शना, दानपुत्री, देवप्रिया, दंतिका, दामिनी, दिव्या, दिव्यांनी, दिव्यश्वरी, दिपा दिपीका, दिपरत्ना, दिपशीला, दिपाली, दिशा, दानपुत्री, दानपाली, देविना, देविका, दिपमाला, दक्षिना, दया, दर्पना, दिपशीला, दमयंती.
ध – धम्मज्योती, धम्मदिना, धम्मपुत्री, धम्मप्रेमी, धम्मधिरा, धम्मशीला, धम्मप्रिया, धम्मनेत्री, धम्मसेनानी, धिरा, धम्मपाली, धनपुत्री, धनकुमारी, धनरत्ना, धनशीला, धम्मप्रेमिका, धम्मदिक्षा, धम्मांजली, धम्मश्वरी, धम्मप्रणाली, धम्मक्रांती, धम्मप्रेरणा, धम्माक्षनी, धम्मनंदा, धम्मकामना, धम्मदर्शना.
ब – बुद्धप्रणाली, बुद्धपुत्री, बुद्धराणी, बुद्धलीला, बुद्धशाली, बुद्धरत्ना, बुद्धप्रभा, बुद्धांजली, बुद्धप्रिया, बाला.
म – महामाया, मायावत, मायादेवी, ममता, मिरा, मिगारमाता, मृगनयनी, मिनाक्षी, मनिषा, मिना, मिता, महाराणी, मनोरमा, मालिनी, मुक्ता, मालती, मनोकामना, मैत्रायणी, मधुशीला, महानंदा, महानंदा, माधुरी, मंगल, मंजरी, मेघा, मेघगर्जना, माया, मधुवती, मधु, मधुबाला, मिनल, मानसी, मनाली, मंदा, मयुरी, मंजुशा, मंजिरी, मंजू, मोनिका, मेनका, मोहिनी, मौसमी, मंजुश्री, मित्तली, मेघना, माधवी, मायश्वरी, मायाक्षी, मधुरत्न, मणिरत्ना, मिक्रांती मयुरी.
र – रोहिणी, रमा, रत्नमाला, रत्नपाली, रंजना, राजकुमारी, राजश्री, राजक्षी, रत्नदिपा, रागिणी, रविना, रिना, रेखा, रत्नसुंदरी, रत्नप्रभा, रत्नशीला, रक्षिता, रत्नज्योती, राखी, राणी, रिटा, रिता, रेणू, रक्षा, रिंकु रत्ना, रेश्मा, रितीका, राजनंदीनी.
रु – रुपाणी, रमाई, रुपा, रुपमाला, रुपेर, रुपनंदा, रुशाली, रुशीता.
ल – ललिता, लिली, लिला, लिलावती, लिलांकी, लिलाश्वरी, लिलकांती, लता, ललिन, लेखा, लिकिता, लुम्बिनी, लिलावती.
न – नालंदा, नागराणी, निर्मला, नंदिनी, नागपुत्री, नंदकुमारी, निरंजना, नंदिनी, निलाक्षी, निलिमा, निलम, निलकुमारी, लकुलकुमारी, नायिका, निशा, निमा, निता, निकिता, निला, नेहा, नयना, नम्रता, निविदा, निलांबरी, निकांती, निलेश्वरी, निलांजनी, निलांजली, नंदा.
प्र – पारमिता, पुनम, पुर्णा, पौर्णिमा, पुष्पा, पुष्पांजली, पुर्णिका, पद्मा, पद्मावती, पाली, पियुषा, पंचशीला, पिना, पारमी, पुजा, पुणिका, प्रेरणा, परिवर्तना.
भ – भिमाई, भिमपुतरी, भिमकुमारी, भिमराणी, भिमज्योती, भिमस्मृती, भिमांजनी, भाविका, भावना, भाग्यश्री, भाग्यशाली, भागयरत्ना, भाग्यशीला, भाग्यवंती, भाग्यरती, भाविना.
ऋ – ऋतुला, ऋतुशा, ऋताक्षी, ऋतुशीला, ऋतुशाली.
वि – विशाखा, विद्या, विनयधारी, वैशाली, वजिरा, वाणी, विनीता, विजया, विजयानंदा, वैजंती, वैशाखी, विनायिका, वैश्यु, वनमाला, वंदा, विमल, वैभवशाली, विक्रमा, विक्रांती, विश्रांती, विक्रमशीला, विक्रमशाली, विनाक्षी, विपश्यना.
श – शीला, शितल, संघप्रिया, सुवर्णा, सुवर्णमाला, सुमिता, सुनीता, सेमता, स्मृती, स्मिता, समाधी, संघनी, सुप्रभार, सुलक्षना, सुमित्रा, सायली, सत्यशीला, सत्यशाली, सुरेखा, सुनंदा, सुंगधा, सुशीला, सुमन, सरिता, सविता, सुषमा, सरोजा, सीमा, सरला, सरस्वती, साधना, संगीता, सया, संघदिपा, सुवासिनी, स्मृती, स्वाती, संजिवनी, सुलोचना, सुलाक्षी, स्वप्नाली, संचिता, संकिता, सांची, सम्राज्ञी, सुष्मिता, सुप्रणा, सुपर्णा, सदिच्छा, सारीका, सुश्रुषा, सुमनांजली, सुमेनांजनी, सुकिता, सती, सोनम, सोनाली, सोनेरी, सरोजिनी, सुहासिनी, सुकेशिनी.
उ – उर्मिला, उरवेला, उरवेशा, उराक्षी, उर्मि, उत्तरा, उरमित, उषा, उमा, अत्पलवर्णा. मुलांची नावे
-----------—---------------------------------------------------------
अ – अभिमन्यु, अमितोधन, अपुर्व, अशिश, आदित्य, अरविंद, अंजन, असित, अजिंक्य, अजातशत्रु, अशोक, अजय, अनिरुद्ध अलंकार, आशुतोष, अंकुश, अमित, अमोल, अनिल, अविजित, आकाश, आयुपाल, अविनाश, अक्षय, अश्वजित, आरीरा, अमर, अगिरस, अग्निदत्त, आदेश, आनंद, अभय, अजित, अमेश, अमरेद्रकुमार, अमररत्न, अमृत, अमृताचंद, अश्वघोष, अहिंसक, आर्यनंद, आर्यसेन, आर्यनरेश, आर्यदेव, अजपाल, अजितसेन, आर्यनरेश, अश्वमेघ, आर्यपुत्र, आलामकालाम, आर्यमित्र, अंगीरस, आनंदकिर्ती, अमिताभ, अमरचंद्र, आनाथमित्र, आलोक, अश्वशील, अंगुलीमाल, आनाथपिण्डक, अर्हन्त, आवाहन, अलंकार, अशिश, आशुतोश, आदर्श, अमरदिप, अनंत, अंकित, अर्शद, ओंकार, अभिजीत, अभिनव, अंकुर, अबोध, अतूल.
इ – इंद्रगुप्त, इद्रंदित्य, इंद्रजित, इंद्रसेन, इंद्रमित्र, इंद्रकुमार, इंद्रवर्धन.
ग – गुणरत्न, गुणानंद, गुणसेन, गुणवर्धन, गुणवंत, गुणसागर, गुणानंत, गुणकुमार, गौतम, गौतमानंद, गौरव, गोवर्धन, गुलशन, गुरुधम्मा, गुणप्रभा.
च – चक्रधर, चक्रवती, चंद्रगुप्त, चंद्रसेन, चंद्रराज, चंद्रमणी, चंद्रबोधी, चंद्रशेखर, चित्रसेन, चंद्रबंधु, चंद्रकांत, चंद्रशील, चैतन्य, चेतक, चेतन, चैत्यकुमार, चैत्यानंद.
ज – ज्योतीपाल, जलपाल, जयानंद, जयप्रकाश, जयसेन, जयन, जीवक, जयवर्धन, जगन, जयमित्र, जयानंत, जयवंत, जितेश, जितेंद्र, जीवन, जय, जयरत्न, जयदिव, जेतनकुमार, जतिन, जयंत.
त – तथागत, तुषार, तिष्यकुमार, तिष्यमित्र, तिष्यसेन, तिष्यानंद, तिष्यानंत, त्रिरत्न, तिस्स, त्रिनेत्र, त्रिदिप, तहंकर, तेजस, तेस, तेजस्वी, तिलोक.
द – दानपाल, दानज्योतस, दानरत्न, दानदिप, दानवंत, दानसेन, दानवीर, दिपकर, देवदत्त, दंडपाणी, देवेंद्र, देवपाल, दानशुर, देवानंद, देविदास, देषप्रीय, दायक, दानप्रकाश, दानप्रिय, दानसागर, दानबोधी, दिपक, दिलीप, दिनकर, दिनेश, दर्पन, दर्शन.
ध – धम्मसेवक, धम्मपाल, धम्मदुत, धम्मप्रकाश, धम्मशील, धम्मविनय, धम्ममित्र, धम्मज्योत, धम्मसागर, धम्मभुषण, धम्ममित्र, धम्मदर्शी, धम्मघोष, धम्मकिरण, धम्मपुत्र, धम्मानंद, धम्मनंत, धम्मरत्न, धम्मज्ञान, धम्मबोधी, धम्मकिती, धम्मधर, धम्मरक्षित, धम्मप्रिय, धरमेंद्र.
न – नागासेन, नंदवर्धन, नंदसेन, नागवर्धन, नागानंद, नागार्जुन, नागेश, नंदेश, नंदकुमार, नरेश, नंदेश, नंदकुमार, नागधम्मो, नागदत्त, नागघोष, नागरत्न, नागबंध, नागप्रिय, नरेंद्र, नरसिंह, नोगपाल, नागराज, नागेंद्र, नंद, नरदत्त, नितीन, निलेश्वरा, निलकांत, निलकंठ, निलराज, निशिकांत, नविन, नवचैतन्य, निखिल, नलेंद्र, निलेंद्र, नयन, निलवंत, निवृत्ती.
प्र – प्रियदर्शी, प्रसेनजित, प्रसन्नकुमार, प्रज्ञानंद, प्रज्ञावंत प्रशांत, प्रमोद, प्रज्ञापुत्र, प्रज्ञाकुमार, प्रदिप, प्रविण, प्रफुल्ल, प्रकाश, प्रल्हाद, प्रतिक, प्रभाकर, प्रमित, प्रमेश, प्रतिकार, प्रणालय, प्रताप, प्रभारत्न, प्राणज्योत, प्रज्ञानंद, प्रज्ञानंत, प्रज्ञारत्न, प्रेमानंद, प्रेमेपाल, प्रेम, प्रसाद, प्रितम, प्रियरत्न, प्रणीव, प्रणव.
ब – बुद्धघोष, बुद्धप्रिय, बुद्धपाल, बोधानंद, बुद्धरत्न, बुद्धसंदेश, बोधीधम्म, बोधीपाल, बोधमृत, बालमित्र, बलभिम, बौद्धिक, बोधी, बुद्धादिप, बोधीप्रिय, बोधीराज, बुद्धसागर, बुद्धभुषण, बुद्धकिर्ती, बोधीसत्व, बोधीमित्र, बुद्धक्षित, बद्धांकु, बुद्धसेन, बुद्धपुत्र, बुद्धकुमार, बुद्धमान, बुद्धप्रणित, बुद्धशक्ती, बुद्धप्रकाश, बुद्धज्ञान, बुद्धज्योत.
भ – भिमराव, भिमसेन, भिमदास, भिमपुत्र, भद्रसेन, भारद्वाज, भारत, भारतरत्न, भिष्म, भिमकुमार, भिमशक्ती, भिमप्रकाश, भिमवीर, भिमप्रिय, भिमज्योत, भिमरत्न, भिमशांत, भिमसागर, भिमानंद, भिमपाल, भिममित्र, भिमराज, भिमअमृत.
म – मिलिंद, महेंद्र, महानाम, महादय, मंगलबोधी, मोगल्यायान, मणिकिर्ती, महाकारुणीक, महेश, महाकाश्यप, मंगेश, मंगलकिर्ती, मंगलराज, मुकेश, माणिक, मंगलराज, मणिरत्न, मोहन, मेत्तानंद, मितेश, मित्तकुमार, मोहर, मधुराज, मधुकर, मंगल, मकुल, मृणल, मधुर, मणेश, मनीष, मोहीन, मेघगर्जना, मेघानंद, मित्तल.
य – रत्नदिप, रत्नबोधी, रत्नपाल, राजरत्न, रमेश, राजकिरण, राष्ट्रपाल, राजदत्त, राजेंद्र, राजेश, राजू, राजपुत्र, रेवत, रोहित, रोहन, रवि, रविंद्र, राज, राजमित्र, राजभूषण, राजपाल, राजानंद, रत्नकिर्ती, राजगृह, रागेश, रितेश, ऋतू, राकेश, रविराज, रविराज, रमाकांत, राहुल, रुपेश, रंधिर, रतन, रोनंक, राजन, रजनी, रजनिकांत, निशी, रोहिन, रंजित.
व – विजयानंद, विकास, विनजय, विजयकुमार, विनायक, विभिषेक, विजेंद्र, विरेंद्र, विरेश, विनयबोधी, विमलकिर्ती, विमलसेन, वीरसेन, विनयवात्सलयान, विशुद्धांनद, विवेक, विद्यपाल, विलास, विनोद, विशांत, विद्यानंद, विनाश, विक्की, विरकुमार, विश्वदीप, विश्वरत्न, वैभव, विराट, विक्रांत, विधान, विक्रम, विनोद, विमलकुमार, वामन, विद्यारत्न.
श – शरणानंद, शरणंकर, शांतीदुत, शांतीदुत, शांतीभद्र, शांतीरक्षित, शीतेश, शैलेश, शांतीशील, शांतीबोधी, शांतीप्रिय, शांतीपाल, शैलेंद्र, शुद्धोधन, शरद, शाक्यकुमार, शाक्यसिंह, शुभम, शशीकांत, शशी, शशीकुमार, शशांक, शिशुपाल, श्वेत, शिल्पकार, शत्रुघ्न, शालिक.
स – सिद्धार्थ, सुमेध, सुमेधबोधी, सुप्रबुद्ध, सुदत्त, सुगत, सुधीर, सुरज, सुमित, सुकेश, सुयश सुमित्र, सुरज, सुनित, सुनिल, सुमंगल, सुबोधी, सुभद्र, सुशील, सुभद्रशील, सुभद्रबोधी, सुरेश, संचित, सुर्यसेन, सुविनय, सुजात, सुगतानंद, सविनाय, सुनानंद, संघरत्न, संघबोधी, संघबोधी, संघपाल, संघानंद, सिंहसेन, सिंहपुत्र, सिंहकुमार, सरनानंद, सत्यदर्शी, सत्यबोधी, सत्यपाल, सत्यदिप, सत्यानंद, सत्यरत्न, सावन, सावंत, सुबोध, सुधम्म, सुसंगत, सतिश, सदानंद, सचिन, सचेत, सारिपुत्र, संदेश, संदिप, सुर्यकांत, संघसेन, सधम्म, सदधम्म, संघमित्र, सुदामा, संग्राम, संघर्ष, सागर, संकेत, सोमेश, सुभाष, सुरेंद्र, सनी, सुर्यास्त, सुजान, सज्जन, सौरभ, सारनाथ, सिदेश, सिद्धांत, सुदिप, सुरत्न, संकेत.
क – करुणानंद, करुणाकिर्ती, किर्तीपाल, कनिष्क, कंथक, कमलेश, कमलाकर, कल्पेश, कल्पक, किरण, किशोर, कौषिक, कपील, कुलदीप, कमलानंद, करण, करुणाकर, कुणाल, करुणादिप, करुणाबोधी, करुणारत्न, करुणावंत, कमलशिल, केतन. उ – उमेश, उत्पल, उरूण, उत्तर, उर्वेश.
धर्मांतराने दलितांना काय दिले ?
– मा. लक्ष्मण मानेशिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अँड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात सार्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ. नरेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणार्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकार्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस., आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्मण आहेत आणि दोन नंबरला पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्मण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो.
साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणार्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले. लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्मणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही.
दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गर्दी दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.
खेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,
अ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.
ब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्या रीतीने संरक्षण व्हावे.
क). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदूंकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणार्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत,
‘खेडापाड्यातून रहाणार्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणार्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.
गेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्मण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते.
या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे?🐬🐬🐬
महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूर्वीच्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे? त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे? मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.ए.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद दुसरा आय.पी.एस. अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे. ज्या ठिकाणी पूर्वीच्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, प्रशासन यंत्रणांमध्ये या समाजाचं काय प्रमाण आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे. आज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते? डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धर्मीय समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहानमोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांतक औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही. डफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय?
सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच सहा महिन्यांपूर्वी अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते? ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार? जोवर हे सारे दलित हिंदू राहतील, तोपर्यंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील.
तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाज तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत.
त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. आणि ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्मणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकार्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.
————————-
रमाबाई आंबेडकर
महामानवाला मोलाची साथ देणाऱ्या या माऊलीच्या
जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न..
शिवाजी महाराजांना छत्रपती बनवण्यात माँ जिजाऊ
यांचा मोठा सहभाग. छत्रपती बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच त्या मातेने शिवाजी
महाराजांवर संस्कार केले. ज्योतिबांना क्रांतीबा महात्मा फुले बनविण्यात त्यांच्या
सहचारिणी माता सावित्रीबाई फुलेंचे योगदान आहे. त्यांनी जर ज्योतिबांच्या समाज
उद्धाराच्या कार्याला बळ दिले नसते तर ज्योतिबांच्या हातून समाज उद्धाराचे काम
घडलेच नसते तत्वच माता रमाईने डाँ. बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी जनाचे
क्रांतीसुर्य बनले. एक कवी रमाईची महती सांगताना म्हणतो -
"भिमराज होते दिव्याच्या समान
परि त्या दिव्याची रमा वात होती."
बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात माता भिमाई
पिता सुभेदार रामजी आंबेडकर यांची मोठी भुमिका आहे. माता भिमाबाईने दिलेले प्रेम,
वात्सल्य
सुभेदार रामजी यांनी त्यांच्या बाल मनावर केलेले संस्कार त्यांच्या जीवनाला
लावलेली शिस्त आणि त्यांच्यात ज्ञानार्जनाची निर्माण केलेली आवड यामुळेच बाबासाहेब
घडले आणि रमाईने सावली बनून बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली साथ व वैयक्तिक जीवनात
मोठा त्याग केला. त्यामुळेच बाबासाहेब महामानव बनले म्हणजेच संयुक्तिक ठरेल.
७ फेब्रवारी १८९८ ते २७ मे १९३५ हा अवघा ३७
वर्षाचा रमाईचा जीवन प्रवास रमाई एका महासुर्याची सावली झाली. स्वत: जळत जळत या
सावळीने त्या सुर्यावर मायेची सावली धरली. "कोट्यावधी" ची ती आई झाली.
रमाईचा जन्म वणंदगाव, दापोली, जिल्हा
रत्नागिरी येथे बुधवार ७ फेब्रवारी १८९८ रोजी झाला. त्याच्या आईचे नाव रुक्मिनी तर
पित्याचे नाव भिकु धोत्रे होते. त्यांना अक्का आणि गौरी या २ बहिणी तर, शंकर
हा लहान भाऊ होता. त्यांचे वडील दाभोळ बंदरावर हमालीचे काम करत असत. भाऊ शंकर
धोत्रे हे मुद्रणालयात नोकरी करित होते. आई वडील लहानपणीच वारल्याने रमाईचे तिच्या
भावंडाचे पालन पोषण चुलत्याने आणि मामाने केले.
१९०७ साली वयाच्या ९ वर्षी त्यांचा विवाह डाँ.
बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिमराव आंबेडकर यांच्याशी झाला. रमाईचा स्वभाव मितभाषी,
दृढ
निश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा पूर्वभाग अत्यंत
काबाड कष्टात, हाल अपेष्टात काढला. पती परदेशी असता हाल
अपेष्टात काढून ही कधी कुरकुर केली नाही किंवा कधी तोंडा वाटे कठोर शब्द काढला
नाही. वेळ प्रसंगी त्यांनी शेणाच्या गोवऱ्या ही थापूल्या. रमाई म्हणजे समाधानी
वृत्ती, मनाचे औदार्य - शुद्ध चारित्र्य ह्यांची मंगल प्रतिमाच होती. रमाई शालीमतेची आणि विनम्रतेची
मुर्ती होती. अडचणीशी भांडत रमाईने आयुष्यभर पतीच्या सुरक्षितेची काळजी वाहिली.
एका अदृश्य आगीत रमाई जळत होत्या. त्यांच्या जीवन साथी युगाला नवा आशय आणि नवी
दिशा देण्यात गुतला होता. त्याच्या कृती उक्तीनी देशात चक्री वादळे उठत होती,
त्यांच्या
वाणीतून लाव्हा सांडत होता. या देशातील जगा वेगळा पशुतेशी ते एकटेच भांडत होता.
इकडे रमाई दरिद्राशी एकटीच भांडत होती. रमाईला ३७ वर्षाचे आयुष्य लाभले. २८ वर्ष
त्यांनी बाबासाहेबांचा संसार केला. या काळात सासऱ्याचा मृत्यू, नवऱ्याच्या
मोठ्या भावाचा मृत्यू आणि गंगाधर, रमेश, इंदू आणि
राजरत्न या मुलांचे मृत्यू तिने पाहिले त्या आधी तिने आई वडीलांचे मृत्यू पाहिले
होते. रमाईला या मृत्यूनी दमवले, कष्टाने थकवले होते. काळज्यांनी तिचे
काळीज कुरतडले होते.
रमाई आगीत ही चांदणे झाली. तिने जळण्यातच गौरव
मानला. युग प्रवर्तकाचा हात सौदर्याचा शिल्पकार हात या देशातील क्रांतीची कलमे
लिहत होता. त्यावेळी कुटूंबाची चिंता त्यांच्या पर्यत पोचून तो विचलीत होऊ नये
यासाठी रमाईने आपल्या आयुष्याला चूड लावली. या तिच्या कृतीनेच तिला देशातील
उपेक्षितांच्या मातृत्वाची महानता दिली. रमाईला लिहता वाचता येत होते. त्यांनी
एकदा बाबासाहेबांना पत्र लिहून "बायका माझ्या गरिबीची चेष्टा करतात. माझ्या
अंगावर सोन्याच्या एकही दागिना नाही" असे म्हणतात. अस कळवल त्यावर
बाबासाहेबांनी रमाईस पत्राने उत्तर दिले. रामू कोणालाही मिळाला नसेल असा दागिना
कदाचित तुला मिळेल! अशा कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला तुच एक दिवस दागिना होशील.
रामू माणसाला दुख मोठ करतात, सुख माणसाला मोठ करत नाहीत. ज्यांना
मोठ व्हायच असत ते लोक दुखाचे आभार मानतात. रमा या दुखाचे तु आभार मान ही दुखे
तुला उजेडात घेऊन जातील. बाबासाहेबांचे म्हणणे रमाईनां पटले.
रमाईना १९१३ ते १९२७ या काळात चार मुले व एक
मुलगी असे ५ अपत्ये झाली. त्यातील यशवंत तेवढा वाचला. भिमरावांना संतती सौख्य
मिळाले नाही त्यामुळे ते हादरून गेले. या दुखातून बाहेर पडणे कठीण झाले.
मातृत्वाचे बुरूज ढासळलेले असताना ही रमाबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी साहेबांच्या
जन सेवेतच आपला दुख विसरून घेतल. एकदा भाविक रमाईने पंढरीच्या विठोबाच दर्शन घ्याव
असा ध्यासच घेतला होता. पंढरपूरला जावून तस दर्शन त्याना कस मिळणार? दुरून
दर्शन घेण्याच्या कल्पना तर, स्वाभिमानी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना
सहनही होत नव्हती, रमाईची समजूत घालण्यासाठी ते म्हणाले -
"जेथे भक्तांना विठोबाच दर्शन ही मिळत
नाही, ते पंढरपूर काय कामाचं तू खंत करु नकोस! त्याग पूर्व जीवन घालवित
सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू, आणि येथेच दुसरे
पंढरपूर निर्माण करु."
महाड सत्याग्रह नंतर रायगड वर उद्भवलेल्या
जीवघेण्या प्रसंगानंतर रमाबाईना बाबासाहेबांची फार चिंता वाटे. साहेब घरी येईपर्यत
त्यांच्या जीवात जीव राहत नसे. रमाईचे मन विशाल होते. त्या प्रेमळ होत्या, कष्टाळू
होत्या. स्वत: च्या मनाला कष्ट देत होत्या. परंतू दुसऱ्याचे मन दुखवत नव्हत्या.
साहेबांवर आणि त्यांच्या शिक्षणावर त्यांचे जीवा पलीकडे प्रेम होते. प्रदिर्घ
आजाराने २७ मे १९३५ रोजी जीवन ज्योत मावळली. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात जे अनमोल
स्थान यशोधरेला आहे. तेच स्थान बाबासाहेबांच्या सिद्धार्थासाठी यशोधरा जशी चंदना
सारखी झिजली तशीच रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहो रात्र झिजली. रमाईच्या
आधारामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ
शकले. समाजाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची शिकवण देऊ शकले.
• 'रामू' च्या स्मृतीस अर्पण -
तिच्या अंत:करणाचा चांगुलपणा: तिच्या मनाचा
उथासपणा; तिच्या चरित्र्याचा निष्कलंकपणा; त्याच प्रमाणे
ज्यावेळी कोणी मित्र उरला नसता. आणि आमच्या पोटा पाण्याच्या विवंचनेचा काळ होता.
असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहण केले व
माझ्या बरोबर ते दु:ख सहन केले आणि मज बरोबर तसले ही दिवस काढले म्हणून तिच्या
वरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.
'पाकिस्तानची फाळणी' या इंग्रजी
ग्रथांच्या प्रथम पृष्ठावर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील अर्पण पत्रिका लिहिली
आहे. तिच रमाईच्या कार्याची पावती आहे. रमाईचा त्याग हा दलित पिडित व शोषितांच्या
कल्याणासाठी आहे. अश्या या कोटी कोटी जनांच्या मातेला त्यांच्या जयंती निमित्त
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि साऱ्या जनतेला मातोश्री रमाबाई आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त
रमाई वंदन गीत
संसार भार शिरावर घेउन ।
दरिद्र्याचे चटके साहून ।
पती सवे देह वाहिला ।
वंदन करतो मी रमा आइल ।।
माता पित्या विना पोरकी झाली ।
मामाच्या टी आश्रयी आली ।
भीमरावांची पत्नी झाली ।
संसार नवा पहिला ।।
घर खर्चाला अड़चन येई ।
शेण वेचन्या फिरली रमाई ।
नाही खचली मनी जराही ।
वनवास खुप साहीला ।।
जनहिताचे कार्य भीमाचे ।
सहकार्य अनमोल रमाचे ।
व्रत घेउन नित्य श्रमाचे ।
लाजविले जाई जुईला ।।
यशोधरा ती गौतामाला ।
प्रेरक ठरली रमा भिमाला ।
काव्य फुलांची गुंफुन माला ।
रितेश अर्पितो रमा आईला ।।
आई रमाई जयंती च्या सर्व भारतीयांना मंगलमय
शुभेच्छा ..।।
जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध भारत