डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 'पोलीस ऍक्शन' प्लॅन; निजामाला दुसरा पाकिस्तान निर्माण करण्यापासून रोखले.
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली हैदराबाद संस्थान अडकलेले होते. हैदराबाद संस्थानात आजचा मराठवाडा, तेलंगणा राज्य व कर्नाटकातील काही जिल्हे यांचा समावेश होता. हैदराबादला स्वतंत्र भारतात सामील करण्यासाठी हैदराबाद स्टेट काँग्रेस निजामाविरोधात संघर्ष करत होते. १० सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थानांवर भारत सरकार लष्करी कारवाई करणार असल्याचे निजामाला समजले. त्यानंतर निजाम युनोकडे स्वतंत्र देश स्थापन करण्यासंदर्भात आपला प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करत होता. लष्करी कारवाई करण्यापूर्वी ७ सप्टेंबर १९४८ रोजी सरदार वल्लभाई पटेल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चर्चा झाली आणि पोलीस ऍक्शनचा प्लॅन ठरला. त्यावेळी डॉ.आंबेडकरांचे घटनात्मक आणि कायदेशीर पाठबळ मिळाले त्यातूनच (हैदराबादेत) मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली आणि दुसरा पाकिस्तान निर्माण करण्याचे निजामाचे मनसुबे उधळून टाकले. पाकिस्तानसारखे निजामाचे आणखी एक राष्ट्र अस्तित्वात असते तर आपल्या देशाचे काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.
त्या संभाव्य भयंकर धोक्याचे वेळीच निवारण करण्याचे श्रेय पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. या तिघा दिग्गज नेत्यांनी मुत्सद्देगिरीने ऐतिहासिक ‘पोलीस ऍक्शन’ची कारवाई केली होती. त्यामुळे निजामाचे ‘युनो’त दाद मागण्यापासूनचे सारे मनसुबे धुळीला मिळाले. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाला शरणागती पत्करावी लागली. त्यानंतर त्याचे हैदराबाद संस्थान खालसा होऊन तिथे ‘तिरंगा’ फडकला.
निजामाचे हैदराबाद संस्थान
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात ५६५ संस्थाने होती. निजामाचे हैदराबाद संस्थान हे त्यापैकीच एक होते. ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या त्या निजामाचे नाव होते मीर उस्मान अलीखान बहादूर नियामुदौला निजाम उल-मुल्क आसफजाह. एक कोटी ७६ लाख लोकसंख्या असलेल्या या संस्थानात सध्याचे संपूर्ण तेलंगणा, आंध्रचे सहा, कर्नाटकाचे सहा जिल्हे आणि आठ जिल्हय़ांचा आपल्या मराठवाडा या प्रांतांचा समावेश होता. त्या काळात जगात सर्वात श्रीमंत गणल्या गेलेल्या निजामाची संस्थानातील १० टक्के भूमीवर खासगी मालकी होती. त्यावरून त्याच्या वर्चस्वाची कल्पना येऊ शकते.
ब्रिटिशांनी संस्थानिकांना आपले स्वतंत्र ‘राष्ट्र’ घोषित करण्याची मुभा दिली होती. बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांनी देशाची फाळणी घडवून ‘पाकिस्तान’ मिळविण्याच्या पाठोपाठ मग हैदराबाद संस्थानाच्या निजामानेही त्याचे संस्थान हे ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित केले होते.
त्याच काळात हैदराबाद संस्थानात रझाकारांनी धुमाकूळ घालून क्रूर पद्धतीने अत्याचार सुरु केले होते. या जुलमी राजवटीला विरोध करत असताना स्वातंत्र्यासाठी मराठवाड्यातील हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भारत सरकार हैदराबाद संस्थानातील प्रश्न चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र निजाम आपले स्वतंत्र राखण्यासाठी प्रयत्न करत होता.
हैदराबादची प्रचंड आर्थिक कोंडी
जनरल करिअप्पा भारताचे सरसेनापती झाल्यानंतर हैदराबादची प्रचंड आर्थिक कोंडी उभारण्यात आली. हैदराबादचे नाणे बेकायदा ठरविण्यात आले. निजामाचे म्हणणे पडले की, नाणे बेकायदा ठरविण्याचा अधिकार भारत सरकारला नाही. भारत सरकारचे म्हणणे की, हैदराबाद एक संस्थान असल्यामुळे त्याचे संबंध नियंत्रित करण्याचे सर्व अधिकार भारत सरकारला आहेत. निजामाची अशी नाकेबंदी होताच त्याचे डोळे उघडले. त्याने करार व वाटाघाटीची भाषा सुरू केली. त्यामुळे बॅ. पटेलांनी निजामाला कळविले की, बिनशर्त भारतात विलीनीकरण एवढेच आता बाकी आहे.
नानज प्रकरण
त्याच सुमारास नानज प्रकरण घडले. नानज हे गाव हैदराबाद राज्यातल्या हद्दीत होते. सोलापूर ते बार्शी हा रस्ता या गावावरून जात असे. भारत सरकारने २६ जुलै १९४८ रोजी नानज ताब्यात घेतले. त्याला निजामसरकारने विरोध करताच भारत सरकारने जाहीर केले की, आम्ही सर्वाभौम असल्यामुळे नानज घेतले. त्यानंतर कासीम रजवी आणि हैदराबाद संस्थानचे सर सेनापती एल. इद्रुस यांनी भारतीय सैनिकांशी लढण्याची असमर्थता व्यक्त केली. कारण तेवढे मोठे सैन्य, रणगाडे, तोफा आणि विमाने हैदराबादजवळ नव्हते. तेव्हा हैदराबाद सरकारने विनंती केली की, हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेऊ द्यावा. बॅ. सरदार वल्लभाई पटेलांनी हैदराबादची ही विनंती फेटाळून लावली.
६ सप्टेंम्बर १९४८ पासून भारत सरकारने निजाम सरकारला बजावले होते की, हैदराबाद संस्थानात कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोसळली असून तेथे अराजक माजलेले आहे हे आम्ही तटस्थ राहून पाहू शकत नाही. परिस्थिती सुधारली नाही, तर आम्ही हस्तक्षेप करणार. हैदराबाद संस्थानाभोवती हळूहळू लष्करी वेढा आवळला जात होता. लष्करी कारवाई करण्याकरिता प्रभावी असा आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळात तयार होत होता. शेवटी ७ सप्टेंबर १९४८ रोजी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीने १३ सप्टेंबरला हैदराबाद ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्य पाठविण्याचे ठरविले.
हैदराबादसंस्थानावर लष्करी कारवाई होणार आहे. याचा सुगावा लागताच दि. १० सप्टेंबर १९४८ रोजी (रात्री) हैदराबादसंस्थानचे परराष्ट्रमंत्री मुईन नवाज जंग यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसकडे रवाना झाले. तत्पूर्वी ते अमेरीकेच्या अध्यक्ष टरुमनकडे गेले होते. त्यात हैद्राबादचे डेप्यूटी स्पिकर बी. शामसुंदर होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टरुमन यांना हैद्राबादचा प्रश्न यूनोत चर्चेला घेण्याची विनंती त्या शिष्टमंडळाने केली. परंतु त्यांनी हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे आपण त्यावर चर्चा करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. हे शिष्टमंडळ सिडने कॉटनच्या ज्या विमानातून पॅरिसकडे गेले होते त्यात निजामाचे जडजवाहीर आणि पैसे होते म्हणतात!
११ सप्टेंबरला बॅ. मोहम्मद अली जीना वारले त्यामुळे पुलिस कारवाई पुढे ढकलण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता परंतु लष्कराला अगोदरच आदेश गेले होते. १२ स्पटेंबरच्या मध्यरात्री म्हणजे १.३० वाजता भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानात सोलापूर - नळदुर्ग, मनमाड - औरंगाबाद, वहाड - जालना, हिंगोली चांदा, आदिलाबाद - बेजवाडा, वरंगल- नलगोंडा, रायपूर - होसपेट मार्गे घुसले.
डॉ आंबेडकर आणि पोलीस ऍक्शन
भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलिस कारवाई केली तेव्हा डॉ. आंबेडकरांनी बॅ. सरदार पटेलांना मोठ्या नेटाचा पाठिंबा दिला होता. पोलिस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी बॅ. पटेल यांनी डॉ. आंबेडकरांशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही असे स्पष्टीकरण त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी बॅ. पटेलांना दिले होते. “आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची युनोमध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैद्राबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक-अर्थ निघू शकतील. डॉ. बाबासाहेबांनीच सुचविले, सैन्य पाठवूच परंतु या कृतीला नाव देऊ, पोलिस ऍक्शन. डॉ. बाबासाहेबांच्या सूचनेचा सरदार वल्लाभाई पटेल यांनी स्वीकार केला आणि पाठविले सैन्य, परंतु नाव दिले पोलिस ऍक्शन. पोलिस ऍक्शन हा शब्दप्रयोग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वापरण्यात आला.
तत्पूर्वी निजामाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची बाजू मांडावी म्हणून निजामाने डॉ.आंबेडकरांना विनंती केली होती. मात्र निजामाची विनंती धुडकावून लावत निजामाला युनोमध्ये प्रतिवाद करण्यासाठी यत्किंचितही जागा राहणार नाही, अशा रीतीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मागोवा घेत कायदेशीर बाजू सांभाळण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. ती पोलिस कारवाई जनरल राजेंद्रसिंगजी (साऊथ कमांड) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. शेवटी शस्त्रसामर्थ्यात निजामाच्या सैनिकांचा भारतीय लष्करापुढे निभाव लागला नाही. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे लष्कर भारतीय सैन्याच्या स्वाधीन होत हैदराबाद भारतात सामील झाले.
संदर्भ :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र - धनंजय किर
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील चित्तथरारक आठवणी - लक्ष्मणराव कापसे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद संस्थान - डॉ.शेषराव नरवाडे
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
मराठवाडा मुक्ती संग्राम आणि बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे पण हे स्वातंत्र्य अधुरे होते. काश्मिर, जुनागड आणि निजाम संस्थानातील जनता अजूनही गुलामीत होती. मराठवाडा आणि तेलंगणात निजामाची राजवट होती. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाला....!
डाॅ.आंबेडकर यांची भूमिका :-
मराठवाडा के साथ पूरा हैदराबाद संस्थान का दलितवर्ग एक तरफ निर्धनता और दूसरी तरफ निजामी अत्याचार,दो पाटों के बीच पिसा जा रहा था.निजाम मीर उस्मान अली खान ने डा.बाबासाहब आंबेडकर को २५ करोड का लालच दिखाकर इस्लाम स्वीकारने का प्रस्ताव भेजा था.यदि दलितवर्ग इस्लाम को ग्रहण करता है तो उन्हें ऊंचे ओहदों पर रखा जाएगा इत्यादि सुविधा देने की बात कही थी.डा.अम्बेडकर ने निजाम के प्रस्ताव को यह कहकर ठुकरा दिया कि,"राज्य के दलित भाई आर्थिक दृष्टी से जरूर निर्धन है लेकिन वे मन से निर्धन नही है.रही मेरे इस्लाम ग्रहण करने की बात मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है."बाबासाहब अम्बेडकर ने १८-११-१९४७ तथा २७-११-१९४७ को एक परिपत्र निकालकर जोर-जबरदस्ती धर्मांतरित किये हुये दलितों को आवाहन किया की वे वापस घर आवें.यह पत्र २८नवम्बर के नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिक में प्रकाशित किया गया.
-------------------------------------------------------------------------------------
मराठवाडा मुक्ती संग्राम -
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
-----------------------------------------------------------------------------------
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या १७ सप्टेंबर रोजी तब्बल 70 वर्षे पूर्ण होत आहेत. 70 वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून वेगळे होण्याची भाषा करीत आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? ( डॉ. राजीव भोसेकर)
१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिनेश कांबळे तर्फे सर्वाना हार्दिक शुभेच्छा .........!
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-=-_-_-_-_-_-_-_-_
विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम!
===
आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं –
मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हिंगोली
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.
यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.
मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –
पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.
या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.
हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!
हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!
हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!
१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.
17 सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.