समाज सुधारक






26 जून ,राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांच्या  जयंती निमित्त
-----------—----------------------------------------

छत्रपती शाहू महाराज  (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.

शाहू महाराज
छत्रपती, राजर्षी
Maharajah of Kolhapur

मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ
इ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहण
एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती
कोल्हापूर जिल्हा
राजधानी
कोल्हापूर
पूर्ण नाव
छत्रपती शाहू महाराज भोसले
जन्म
जून २६, इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल
मृत्यू
मे ६, इ.स. १९२२
मुंबई
पूर्वाधिकारी
छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
'
राजाराम ३
उत्तराधिकारी
छत्रपती राजाराम भोसले
वडील
आबासाहेब घाटगे
आई
राधाबाई
पत्नी
महाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणे
भोसले


*शाहू महाराजांचे जीवन कार्य*

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो.

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

*जातिभेदाविरुद्ध लढा :-*

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

                      🙏     








     रमाबाई आंबेडकर 

महामानवाला मोलाची साथ देणाऱ्या या माऊलीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न..

शिवाजी महाराजांना छत्रपती बनवण्यात माँ जिजाऊ यांचा मोठा सहभाग. छत्रपती बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच त्या मातेने शिवाजी महाराजांवर संस्कार केले. ज्योतिबांना क्रांतीबा महात्मा फुले बनविण्यात त्यांच्या सहचारिणी माता सावित्रीबाई फुलेंचे योगदान आहे. त्यांनी जर ज्योतिबांच्या समाज उद्धाराच्या कार्याला बळ दिले नसते तर ज्योतिबांच्या हातून समाज उद्धाराचे काम घडलेच नसते तत्वच माता रमाईने डाँ. बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी जनाचे क्रांतीसुर्य बनले. एक कवी रमाईची महती सांगताना म्हणतो -

"भिमराज होते दिव्याच्या समान
परि त्या दिव्याची रमा वात होती."

बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात माता भिमाई पिता सुभेदार रामजी आंबेडकर यांची मोठी भुमिका आहे. माता भिमाबाईने दिलेले प्रेम, वात्सल्य सुभेदार रामजी यांनी त्यांच्या बाल मनावर केलेले संस्कार त्यांच्या जीवनाला लावलेली शिस्त आणि त्यांच्यात ज्ञानार्जनाची निर्माण केलेली आवड यामुळेच बाबासाहेब घडले आणि रमाईने सावली बनून बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली साथ व वैयक्तिक जीवनात मोठा त्याग केला. त्यामुळेच बाबासाहेब महामानव बनले म्हणजेच संयुक्तिक ठरेल.

७ फेब्रवारी १८९८ ते २७ मे १९३५ हा अवघा ३७ वर्षाचा रमाईचा जीवन प्रवास रमाई एका महासुर्याची सावली झाली. स्वत: जळत जळत या सावळीने त्या सुर्यावर मायेची सावली धरली. "कोट्यावधी" ची ती आई झाली. रमाईचा जन्म वणंदगाव, दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे बुधवार ७ फेब्रवारी १८९८ रोजी झाला. त्याच्या आईचे नाव रुक्मिनी तर पित्याचे नाव भिकु धोत्रे होते. त्यांना अक्का आणि गौरी या २ बहिणी तर, शंकर हा लहान भाऊ होता. त्यांचे वडील दाभोळ बंदरावर हमालीचे काम करत असत. भाऊ शंकर धोत्रे हे मुद्रणालयात नोकरी करित होते. आई वडील लहानपणीच वारल्याने रमाईचे तिच्या भावंडाचे पालन पोषण चुलत्याने आणि मामाने केले.

१९०७ साली वयाच्या ९ वर्षी त्यांचा विवाह डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिमराव आंबेडकर यांच्याशी झाला. रमाईचा स्वभाव मितभाषी, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा पूर्वभाग अत्यंत काबाड कष्टात, हाल अपेष्टात काढला. पती परदेशी असता हाल अपेष्टात काढून ही कधी कुरकुर केली नाही किंवा कधी तोंडा वाटे कठोर शब्द काढला नाही. वेळ प्रसंगी त्यांनी शेणाच्या गोवऱ्या ही थापूल्या. रमाई म्हणजे समाधानी वृत्ती, मनाचे औदार्य - शुद्ध चारित्र्य ह्यांची मंगल  प्रतिमाच होती. रमाई शालीमतेची आणि विनम्रतेची मुर्ती होती. अडचणीशी भांडत रमाईने आयुष्यभर पतीच्या सुरक्षितेची काळजी वाहिली. एका अदृश्य आगीत रमाई जळत होत्या. त्यांच्या जीवन साथी युगाला नवा आशय आणि नवी दिशा देण्यात गुतला होता. त्याच्या कृती उक्तीनी देशात चक्री वादळे उठत होती, त्यांच्या वाणीतून लाव्हा सांडत होता. या देशातील जगा वेगळा पशुतेशी ते एकटेच भांडत होता. इकडे रमाई दरिद्राशी एकटीच भांडत होती. रमाईला ३७ वर्षाचे आयुष्य लाभले. २८ वर्ष त्यांनी बाबासाहेबांचा संसार केला. या काळात सासऱ्याचा मृत्यू, नवऱ्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू आणि गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न या मुलांचे मृत्यू तिने पाहिले त्या आधी तिने आई वडीलांचे मृत्यू पाहिले होते. रमाईला या मृत्यूनी दमवले, कष्टाने थकवले होते. काळज्यांनी तिचे काळीज कुरतडले होते.

रमाई आगीत ही चांदणे झाली. तिने जळण्यातच गौरव मानला. युग प्रवर्तकाचा हात सौदर्याचा शिल्पकार हात या देशातील क्रांतीची कलमे लिहत होता. त्यावेळी कुटूंबाची चिंता त्यांच्या पर्यत पोचून तो विचलीत होऊ नये यासाठी रमाईने आपल्या आयुष्याला चूड लावली. या तिच्या कृतीनेच तिला देशातील उपेक्षितांच्या मातृत्वाची महानता दिली. रमाईला लिहता वाचता येत होते. त्यांनी एकदा बाबासाहेबांना पत्र लिहून "बायका माझ्या गरिबीची चेष्टा करतात. माझ्या अंगावर सोन्याच्या एकही दागिना नाही" असे म्हणतात. अस कळवल त्यावर बाबासाहेबांनी रमाईस पत्राने उत्तर दिले. रामू कोणालाही मिळाला नसेल असा दागिना कदाचित तुला मिळेल! अशा कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला तुच एक दिवस दागिना होशील. रामू माणसाला दुख मोठ करतात, सुख माणसाला मोठ करत नाहीत. ज्यांना मोठ व्हायच असत ते लोक दुखाचे आभार मानतात. रमा या दुखाचे तु आभार मान ही दुखे तुला उजेडात घेऊन जातील. बाबासाहेबांचे म्हणणे रमाईनां पटले.

रमाईना १९१३ ते १९२७ या काळात चार मुले व एक मुलगी असे ५ अपत्ये झाली. त्यातील यशवंत तेवढा वाचला. भिमरावांना संतती सौख्य मिळाले नाही त्यामुळे ते हादरून गेले. या दुखातून बाहेर पडणे कठीण झाले. मातृत्वाचे बुरूज ढासळलेले असताना ही रमाबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी साहेबांच्या जन सेवेतच आपला दुख विसरून घेतल. एकदा भाविक रमाईने पंढरीच्या विठोबाच दर्शन घ्याव असा ध्यासच घेतला होता. पंढरपूरला जावून तस दर्शन त्याना कस मिळणार? दुरून दर्शन घेण्याच्या कल्पना तर, स्वाभिमानी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना सहनही होत नव्हती, रमाईची समजूत घालण्यासाठी ते म्हणाले -

"जेथे भक्तांना विठोबाच दर्शन ही मिळत नाही, ते पंढरपूर काय कामाचं तू खंत करु नकोस! त्याग पूर्व जीवन घालवित सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू, आणि येथेच दुसरे पंढरपूर निर्माण करु."

महाड सत्याग्रह नंतर रायगड वर उद्भवलेल्या जीवघेण्या प्रसंगानंतर रमाबाईना बाबासाहेबांची फार चिंता वाटे. साहेब घरी येईपर्यत त्यांच्या जीवात जीव राहत नसे. रमाईचे मन विशाल होते. त्या प्रेमळ होत्या, कष्टाळू होत्या. स्वत: च्या मनाला कष्ट देत होत्या. परंतू दुसऱ्याचे मन दुखवत नव्हत्या. साहेबांवर आणि त्यांच्या शिक्षणावर त्यांचे जीवा पलीकडे प्रेम होते. प्रदिर्घ आजाराने २७ मे १९३५ रोजी जीवन ज्योत मावळली. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात जे अनमोल स्थान यशोधरेला आहे. तेच स्थान बाबासाहेबांच्या सिद्धार्थासाठी यशोधरा जशी चंदना सारखी झिजली तशीच रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहो रात्र झिजली. रमाईच्या आधारामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले. समाजाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची शिकवण देऊ शकले.

• 'रामू' च्या स्मृतीस अर्पण -
तिच्या अंत:करणाचा चांगुलपणा: तिच्या मनाचा उथासपणा; तिच्या चरित्र्याचा निष्कलंकपणा; त्याच प्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नसता. आणि आमच्या पोटा पाण्याच्या विवंचनेचा काळ होता. असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहण केले व माझ्या बरोबर ते दु:ख सहन केले आणि मज बरोबर तसले ही दिवस काढले म्हणून तिच्या वरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.

'पाकिस्तानची फाळणी' या इंग्रजी ग्रथांच्या प्रथम पृष्ठावर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील अर्पण पत्रिका लिहिली आहे. तिच रमाईच्या कार्याची पावती आहे. रमाईचा त्याग हा दलित पिडित व शोषितांच्या कल्याणासाठी आहे. अश्या या कोटी कोटी जनांच्या मातेला त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि साऱ्या जनतेला मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त

      रमाई वंदन गीत

संसार भार शिरावर घेउन ।
दरिद्र्याचे चटके साहून ।
पती सवे देह वाहिला ।
वंदन करतो मी रमा आइल ।।

माता पित्या विना पोरकी झाली ।
मामाच्या टी आश्रयी आली ।
भीमरावांची पत्नी झाली ।
संसार नवा पहिला  ।।

घर खर्चाला अड़चन येई ।
शेण वेचन्या फिरली रमाई ।
नाही खचली मनी जराही ।
वनवास खुप साहीला ।।

जनहिताचे कार्य भीमाचे ।
सहकार्य अनमोल रमाचे ।
व्रत घेउन नित्य श्रमाचे ।
लाजविले जाई जुईला ।।

यशोधरा ती गौतामाला ।
प्रेरक ठरली रमा भिमाला ।
काव्य फुलांची गुंफुन माला ।
रितेश अर्पितो रमा आईला ।।

आई रमाई जयंती च्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा ..।।


जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध भारत