नालंदा बौद्ध विद्यापीठ .
नालंदा विद्यापीठ: विश्व जगतात सर्वात प्राचीन बौद्ध विश्वविद्यालय म्हणून नालंदा विद्यापीठाची ख्याती आहे. नालंदा हे बिहार राज्यातील सुप्रसिद्ध अस्रे प्राचीन बौद्ध अवशेषांचे एक स्थळ आहे. नालंदा हे बुद्धाचे पट्टशिष्य सारीपुत्त ह्यांचे जन्मस्थान असल्यामुळे बौद्धांचे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होते. ते गंगेच्या काठी पाटण्याच्या आग्नेयीस सुमारे ७० कि.मी. वर व राजगिरच्या उत्तरेस ११-२७ कि. मी. वर वडगाव नामक खेड्याच्या परिसरात वसले होते. नालंदा हे प्राचीन विद्यापीठ म्हणून भारतात ख्यातनाम होते. प्राचीन वाङ्मयात नालंदाची नल, नालक, नालकग्राम, नालंद वगैरे भिन्न नामांतरे आढळतात. नालंदा या नावाविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. इ. स. ४१० मध्ये चिनी यात्रेकरू फाहियान यांने नालंदाला भेट दिली होती, त्यावेळी नालंदाचे हे विहार बौद्धाचे विद्यालय (बौद्ध विद्यालय) होते. तरी सुद्धा वडगावच्या ह्या नालंदा बौद्ध विहारात, इ. स. च्या तिसऱ्या शतकात नागार्जुन आणि इ. स. ३२० मध्ये आर्यदेव हे दोन विद्वान पंडीत निर्माण झालेत यावरून या विद्यापीठाचे प्राचीन काळात किती महत्व असेल याची कल्पना येते.
नालंदा विद्यापीठाची जागा प्रशस्त व निसर्गरम्य होती. एका विस्तृत परकोटात विद्यपीठाच्या इमारती होत्या. या इमारतीपैकी काही महाविद्यालयाच्या काही ग्रंथालयाच्या तर काही आचार्याच्या व विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमारती होत्या. काही इमारती दोन मजली, काही चार मजली तर काही नऊ मजली होत्या. इमारतीच्या भिंती व स्तंभ अलंकृत होते. विद्यापीठाच्या भोवताली अत्यंत रमणीय बाग होती. ठिकठिकाणी कमळांची सरोवरे होती. निवास स्थानात विपूल प्रमाणात स्नानगृहे व इतर आवश्यक सोयी होत्या. तसेच विद्यापीठाच्या प्रांगणात क्रिडांगणे होती. या विद्यापीठात जवळपास १५१० अध्यापक आणि १०,५०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. नालंदा विद्यापीठातील धर्मगंज या विभागात जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचे विशाल ग्रंथसंग्रहालय होते. ग्रंथसग्रलयाच्या तीन इमारती होत्या, त्यांची नोंद ‘धर्मगंज’ मध्ये रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजन नावाच्या तीन इमारतीत नालंदा विद्यापीठाचा ग्रंथसंग्रह सामावलेला होता. यापैकी रत्नोदधी ही इमारत नऊ मजली होती आणि प्रामुख्याने या इमारतीत तांत्रिक पंथासंबंधीचे वाड्मय होते. रत्नसागर आणि रत्नरंजन ह्या दोन इमारती सहा मजली होत्या. या तीन इमारतीमध्ये नालंदा विद्यापीठाचे लक्षावधी ग्रंथ ठेवण्यात आले होते. एवढा प्रचंड ग्रंथ संग्रह त्या काळात जगाच्या पाठीवर कुठेही नव्हता. येथील ग्रंथांना रत्न समजून ग्रंथालय भवनांना इतकी यथार्थ नावे दिलेली होती की ती अन्यत्र कुठेही आढळत नाही.
नालंदा विद्यापीठातील अभ्यासक्रम उच्च कोटीचा होता. तसेच या विद्यापीठात उच्च शिक्षणाचीच सोय होती. त्यात व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, योग्यविद्या व अठरा संप्रदाय या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश होता. बौद्ध धर्माशिवाय जैन व हिंदू धर्माचेही तत्वज्ञान नालंदा विद्यापीठात शिकविले जात होते. धर्मग्रंथाबरोबरच व्यवहारिक विषयांचे ज्ञानही येथे दिले जाई. चित्रकला, शिल्पकला, मंत्रविद्या, गणितशास्त्र, स्थापत्यकला अशा विविध विषयांचे अध्ययन नालंदा विद्यापीठात त्यावेळी होत होते. त्याच प्रकारे विविध भाषांचेही अध्यापन येथे चालत होते.
परदेशातूनही विद्यार्जनाच्या ओढीने विद्यार्थी नालंदा विद्यापीठात येऊन नालंदा विद्यापीठाची ख्याती लवकरच सर्वत्र पसरली होती. विद्यापीठात प्रवेश दुर्मिळ होता. नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षा होत असे. प्रवेश परिक्षेत अत्यंत कठीन प्रश्न विचारले जात असत. प्रवेश परिक्षा खुप कठीन होत असे. प्रवेश परिक्षेत केवळ २०% ते ३०% विद्यार्थी उत्तीर्ण होत असत आणि तेवढ्यानांच विद्यापीठात प्रवेश मिळत असे विद्यार्जन निःशुल्क होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठातील आचार्यासाठी ज्याप्रकारे भोजन-निवासाची व्यवस्था होती. त्याच प्रकारे विद्यार्थ्यासाठी ही निवासाची व्यवस्था केलेली होती.
नालंदा विद्यापीठात ऋषीतुल्य आचार्याची फार मोठी परपंरा निर्माण झाली. धर्मपाल, चंद्रपाल, गुणमती, स्थिरमती, प्रभामित्र, ध्यानचंद्र, शीलचंद्र यासारखे श्रेष्ठ कुलपती नालंदा विद्यापीठात होऊन गेले. नालंदा विद्यापीठाच्या प्रदीर्घ पंरपरेत नागार्जुन, आर्यदेव, वसुबंधू , अंग, शीलभद्र, शांतरक्षित, जिनमित्र व ज्ञानचंद्र यासारखे थोर विद्वान आचार्य नालंदा विद्यापीठातून होऊन गेले. येथील आचार्य सर्व प्रकारच्या विद्यामध्ये पारंगत (निपून) होते. त्याही पलीकडे त्यांनी तत्वज्ञान, न्यायशास्त्र व तंत्रज्ञान यासारख्या विषयावर महत्वपूर्ण ग्रंथही लिहलेत. विशुद्ध चारित्र्य आणि अजोड विद्वता याबद्दल या सर्व ऋषीतुल्य आचार्याची सर्वत्र ख्याती होती.
नालंदा विद्यापीठामध्ये चीन, मंगोलिया, थाईलंड, श्रीलंका, बर्मा, कोरिया इत्यादी देशातून विद्यार्थी विद्यार्जनाकरिता येत होते. विद्यार्थाकडून कोणत्याच प्रकारची शुल्क घेत नव्हते. विद्यार्थासाठी भोजनाची व्यवस्था व वस्त्र मोफत दिले जात होते. या विद्यापीठाकरिता धन (संपत्ती) गावा - गावातून येत होते. यांच्या नावाकरिता २०० समृद्ध गांव लागलेले होते. ज्यांच्या मधून ५०% धन एकट्या सम्राट हर्षवर्धनांनी दिलेले होते ही गोष्ट बौद्ध जगतात गौरवाचा विषय आहे. तथागत बुद्धाच्या काळात नालंदा एक समृद्ध गाव होता (कस्बा) या विद्यापीठात बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या जास्त होती. येथे प्रावारिक नावाच्या एक श्रीमंताने तथागत प्रावारिक भवन आणि आम्रवन दान दिलेले होते. या ठिकानी कधी-कधी तथागत बुद्ध निवास करीत होते. एक वेळा तर महावीर जैन आणि तथागत बुद्ध एकाच वेळी नालंदा मध्ये थांबले होते. (निवास केला होता)
बौद्ध धर्मग्रंथाचे अध्ययन करणे आणि धार्मिक स्थळांना भेटी देणे हा ह्यू - एन - त्संगाचा भारत भेटीमागील मुख्य उद्देश होता. नालंदा विद्यापीठात त्याने संस्कृतचे व बौद्ध तत्वज्ञानाचे अध्ययन केले. नालंदा वर्षे राहून विद्यापीठात असतांना त्यांनी अध्यापनाचेही कार्य केले. सातव्या शतकात नालंदा विद्यापीठात आलेल्या ह्यू - एन - त्संगांने नालंदा विद्यापीठासंबंधी सविस्तर माहिती लिहून ठेवलेली आहे. ह्यू - एन - त्संग नालंदा विद्यापीठात आले त्यावेळी म्हणजेच सम्राट हर्षवर्धनाच्या काळात नालंदा विद्यापीठामध्ये १०,००० विद्यार्थी अध्ययनाचे कार्य करीत होते. व १५०० शिक्षक अध्यपनाचे कार्य करीत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरूपद शिलभद्र याने भूषविले होते. प्रतिदिन वाद - विवाद व चर्चा आयोजित केल्या जात. विद्यापीठात रोज १०० भाषणे व परिसंवाद विद्वानाकडून होत असत. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अभ्यास वर्गासाठी होत्या. असलेल्या खोल्यांची संख्या ३,००० ते ४,००० होती. १,००० मोठ्या खोल्या अभ्यास वर्गासाठी होत्या.
सम्राट हर्षवर्धनाच्या काळात नालंदा विद्यापीठ जगविख्यात विद्याकेंद्र होते. या विद्यापीठात शिक्षणासाठी देशाविदेशातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येत असत. आशिया खंडातील प्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ म्हणून नालंदा विद्यापीठ प्रख्यात होते. सम्राट हर्षवर्धनांने नालंदा विद्यापीठाच्या योगत्येसाठी चालत असे शिवाय हर्षाचा राजाश्रय होताच.
इ.स. १२०० च्या सुमारास मुहमंद बिन बखत्यार खिलजीने “ज्ञान कुराणातच आहे, अन्यत्र नाही.” अशा भ्रामक व खुळचट समजुतीने नालंदा विद्यापीठावर ब्राह्मणांच्या मदतीने घणाघाती प्रहार केला. विद्यापीठातील हजारों भिक्खूची, अध्यापकाची सरसकट कत्तल करण्यात आली. अतिशय खुणशीपणाने व क्रोर्याने 'जिहाद' च्या भावनेतून धर्मवेड्या मुसलमानांनी नालंदा विद्यापीठाचा विध्वंस करून नालंदा विद्यापीठ जाळून टाकले. या क्रूर, अमानुष, रानटी विध्वंसात 'धर्मगंज' विभागातील लक्षावधी बहुमोल ग्रंथसंपदा आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाली. आज नालंदा विद्यापीठाचे अवशेष देखील पहायला दुर्लभ झाले आहे.
नालंदा विद्यापीठाचे वास्तविक महत्व इ.स. पाचवी शताब्दी मध्ये गुप्त वंशीय राजाच्या शासन काळापासून प्रकाशात येते. जेव्हा भारतात प्रथम विश्वविद्यालयाची स्थापना झाली. यापूर्वी भारतीय शिक्षण व्यवस्था दोन स्वरूपात (प्रकारची) होती. पहिल्या प्रकारची शिक्षण व्यवस्था केवळ समाजातील उच्च वर्णीय लोकांकरिता होती. आणि दुसरी शिक्षण व्यवस्था जाने-माने आचार्य आपल्या घरीच शिष्याच्या समुहाला शिक्षण देत होते. ज्याला गुरुगृह (पूर्वीची आश्रम व्यवस्था) म्हटल्या जाते. परंतु बौद्धांनी शिक्षण हे जन सामान्यकरिता उपलब्ध करून दिले. आणि विहारातून बौद्ध विश्वविद्यालयात झाले आणि ज्यात नालंदा हे सर्वात पहिले विद्यापीठ होते.
भारतीय इतिहास कोश नावाच्या ग्रंथात लिहले आहे की, गुप्त सम्राट बालदित्य ने सन ४७० इ. मध्ये नालंदा मध्ये एक सुंदर विहार निर्माण केले आणि त्यामध्ये तथागत बुद्धाची ८० फूट उंचीची ताब्यांच्या मूर्तीची स्थापना केली.
नालंदा विद्यापीठाची पुरातात्वीक साक्ष म्हणजे कुमारगुप्त प्रथम च्या काळातील मिळालेले सिक्के आहेत. युवान च्वांग च्या अनुसार गुप्त वंशाच्या पाच राजांनी क्रमश पाच विहार निर्माण केले होते. या व्यतिरिक्त बालदित्य ने सुद्धा एक विहार बांधले होते आणि सहावा विहार मध्ये भारताच्या शासकाने बनविले होते. गुप्त शासकांची नालंदा विद्यापीठाच्या संदर्भात रूची म्हणजे नरसिंहगुप्त, कुमारगुप्त (II) बुद्धगुप्त व विष्णुगुप्त यांची येथील मिळालेल्या शिलावरून त्याची रूची स्पष्ट होते.
बौद्ध जगतात नालंदा विद्यापीठाची प्रसिद्धी अन्तरराष्ट्रीय ख्यातीची होती इथे मिळालेले या काळातील ताम्रपत्र अभिलेख यावरून या विद्यापीठाच्या अन्तरराष्ट्रीय ख्यातीची कल्पना करता येईल. या प्रसिद्ध बौद्ध विद्वानाचे गंभीर ज्ञान, अथक परिश्रम आणि अनुशासीत आचरण इत्यादी. पाल राजाच्या शासन काळात नालंदा विद्यापीठ आपल्या उच्च शिखरावर पोहचले होते. नागार्जुन, आर्यदेव, असंग, वसुबंधू इत्यादी येथील प्रधान पंडीत होते.
नालंदा विद्यापीठ मुहमंद बख्तियार खिलजी ने केलेल्या आक्रमणामुळे विद्यापीठ पूर्णपणे तहस-नहस झालेले होते. इ.स. १२३५-३६ मध्ये नालंदा विद्यापीठात येणारे तिब्बती यात्री धर्मस्वामी यांनी नालंदा विद्यापीठाच्या दुलर्भ स्थितीचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या नुसार जास्तीत जास्त इमारती नष्ट झाल्या होत्या. आणि केवळ प्रधान पंडीत राहूलश्रीभद्र आणि त्याचे ७० शिष्य (Students) राहीले होते. याप्रकारे नालंदा विद्यापीठाचे महत्व पूर्णपणे नाहीसे झाले होते (कमी झाले होते) इथ पर्यंत की नालंदा विद्यापीठाचे नाव सुद्धा विसरले होते. परंतु अलेक्झेण्डर कनींघम ने पुन्हा या विद्यापीठाची ओळख करून आधुनिक जगाच्या समोर एक प्राचीन जगातील महान विश्वविद्यालय आहे. हे स्थापित केले.
सर्वप्रथम नालंदा विद्यापीठाच्या अवशेषावर (खण्डर) बुछनॉन हॅमीलटन (Buchanon Hamilton) याची नजर पडली. जेव्हा की ते इ.स.१८११-१२ मध्ये येथे आले होते. परंतु या विद्यापीठाची वास्तविक ओळख जवळपास ५० वर्षांनंतर अलेक्झण्डर कनींघम यांच्या द्वारे झाली. त्याने चिनी यात्री यांच्या वर्णनावरून आणि प्राप्त अभिलेखाच्या आधारे या विद्यापीठाची ओळख करून दिली.
सन १९१५ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानी नालंदाच्या उत्खनन कार्याला सुरुवात केली. आणि भारतातील हे सर्वात पहिले विश्वविद्यालय आहे असे संपूर्ण जगाला दाखविले. आणि भारतातील ज्ञानाची प्राचीन परंपरा असलेल्या महान केंद्राची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित केली.
नालंदा विद्यापीठ केवळ ज्ञानाचेच नाही तर अन्य कलांचे सुद्धा केंद्र होते. आजच्या युगातील नालंदा विद्यापीठाचे प्राचीन वैभवाला जीवंत ठेवण्यासाठी इथे ‘नव-नालंदा महाविहाराची' सन् १९५१ मध्ये स्थापना केलेली आहे. या महाविहाराची स्थापना महान विद्वान व भिक्खू जगदीश काश्यप यांनी केली. त्यांनी नालंदा विद्यापीठाचे प्राचीन काळातील वैभव (महत्व) वापस (परत मिळविण्यासाठी) आणण्याकरिता जीवनाचा शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. या प्रकारे नालंदा हे प्राचीन इतिहासातील जिज्ञासुची ज्ञान - पिपासाची पूर्तता करण्याबरोबरच बौद्ध धर्माच्या संबंधीत आधुनिक ज्ञानाचे इच्छुकाचे पण केन्द्र बनले आणि म्हणून प्राचीन काळासारखे आज सुद्धा नालंदामध्ये थाईलंड, बर्मा, श्रीलंका, जपान इत्यादी देशातून भिक्खू व प्राप्ती करतात. उपासक येऊन भेट देऊन) प्राचीन विश्वविद्यालयाला जीवंत करून ज्ञानाची प्राप्ती करतात.
प्राचीन वाङ्मयीन पुराव्यानुसार नालंदाची प्राचीनता मौर्यकाळातील अशोकाच्या साम्राज्यापर्यंत जाते, तथापी या स्थळाची भरभराट इ.स. सनाच्या पाचव्या सहाव्या शतकापासून पुढे झाली, आणि हर्षवर्धन व पाल राजे (आठवे ते बारावे शतक) यांचा उदार आश्रय येथील विद्यापीठास मिळाला. कॅनिंगॅहम यांनी या स्थळाचा शोध १८७१ मध्ये लावला; पण प्रत्यक्ष उत्खनन मात्र १९५६ पासून पुढे कित्येक वर्षे करण्यात आले. यात अनेक मंदिरे, विहार, स्तूप, मुद्रा व ब्राँझच्या मुर्ती सापडल्या. अनेक पायऱ्या असलेली उत्तुंग विहारे, मध्ये चौक व भोवताली व्हरांडा आणि अनेक खोल्या असलेले अनेक विहार आणि सभागृहे आढळली. यावरून प्राचीन विद्यापीठीय जीवनाची कल्पना येते, या इमारतीचे स्तंभ आणि भिंती कलात्मक चित्रांनी व कोरीव कामाने सजविलेल्या होत्या. विद्यार्थ्याचे जीवन कसे होते. यावर प्रकाश टाकणारा पुरावाही येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. विहार अनेक आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा पुरावाही मिळतो. सुमात्रांच्या राजाच्या विनंतीवरून देवपाल राजाने विहारांना गावे इनाम ग्रंथाचा दिल्याचा ताम्रपट सापडला आहे . नालंदा विहाराच्या तसेच खाजगी व श्रेणीच्या मुद्राही बऱ्याच मिळाल्या आहेत. अनेक स्तुपात मठ व धार्मिक मजकूर असलेल्या मृण्मुद्राही हाती आल्या आहेत.
नालंदा विद्यापीठ प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ, बिहार राज्यातील राजगिरच्या उत्तरेस ११-२७ कि.मी. अंतरावर हे विद्यापीठ होते. त्याची स्थापना इ.स. पाचव्या शतकाच्या सुरूवातीस झाली असावी. याचे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचा शिष्य आर्यदेव यास देतात. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर “श्री नालंदा महाविहार-आर्य भिक्खू संघस्य” असे लिहलेले आहे व तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचे धर्मचक्र आहे.
नालंदा विद्यापीठाच्या सुमारे दीड कि.मी. लांब व सुमारे पाऊण कि.मी. रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतीगृह होते. त्याच प्रकारे सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी ती इमारती होत्या, या ग्रंथालयाच्या विभागास धर्मगंग म्हणत, तसेच निवासासाठी ४,००० व अभ्यासासाठी १,००० खोल्या होत्या. १,००० विद्यार्थी व १,५०० शिक्षक होते आणि प्रत्येक दिवशी शंभर व्याख्याने होत. येथे राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडालत्ता, औषधोपचार व शिक्षण विनामुल्य असे. हा सर्व खर्च दान दिलेल्या १०० खेड्यांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यांतून चालत असे.
चारित्र्यसंपन्न व बुद्धिवान शिक्षक, अभ्यासू व होतकरू विद्यार्थी, कुशल प्रशासन, राज्यकर्त्यांचा सतत लाभलेला आश्रय यामुळे नालंदा विद्यापीठाची उत्तरोत्तर सतत आठ शतके भरभराट होत गेली. भारतातील अध्ययन अध्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व समृद्धी मिळवून देण्यात या विद्यापीठाचा वाटा फार मोठा आहे.
ह्यू - एन - त्संगने संघरामाच्या संदर्भात फार मोठ्या प्रसन्नतेने वर्णन केलेले आहे. त्याने आपल्या प्रवास वर्णनात म्हटले आहे की, पद्धतशीर बांधलेले उंच उंच मनोरे, अनेक मडंळ व प्रासाद व ज्यांची शिखरे जणू अभ्रमंडळ भेदून वर गेली आहेत, अशा प्रकारचे विहारे सर्वात मोठे सुंदर दिसत असते. या विहाराभोवती एक निलवर्ण जलप्रवाह वाहत असून त्याची शोभा त्यातील नीलोत्पलांनी अधिकच वृद्धीगंत केली होती. तसेच विहारामध्ये तेजस्वी सुवर्ण-पुष्पांच्या भारांनी वाकलेले कर्णिकार वृक्ष होते. तर बाहेर आम्रवृक्षवाटिकांच्या घनदाट छायेने भिक्खूची निवास्थाने आच्छादली होती. संघारामात आठ मोठ मोठे भव्य चौक होते. तसेच निरनिराळ्या चौकात भिक्खूनी राहण्यासाठी बांधलेल्या अनेक अशा चार मंजिली इमारती होत्या. संघारामात राहणाऱ्या व बाहेरून येणाऱ्या भिक्खूची संख्या नेहमी १०,००० पर्यंत असे, आणि हे सर्व भिक्खू महायानी पंथांचे आहेत. अठरा पंथांचे अनुयायी एकत्रीत झाले होते. संघारामात वैद्यकीय ग्रंथ गृहशास्त्र आणि गणित शास्त्र इ. येथे अनेक विषयांचा अभ्यास होतो. संघारामात १०० व्यासपीठे असून शिष्य आपल्या गुरूंचे पाठ प्रवचने मोठ्या निष्ठेने श्रवण करीत असतात. ह्यू - एन - त्संगच्या प्रवास वर्णनावरून नालंदा विद्यापीठात सहा संघाराम होते, त्यापैकी एक पडलेला होता. आणि पाच चांगल्या स्थितीमध्ये विद्यमान होते. यापैकी एक मगधचा राजा महेद्रादित्य कुमारगुप्त यांनी बांधला होता. तसेच त्यामध्ये एक विहार ही बांधले होते. येथे चाळीस श्रमणांना दररोज भोजन दिले जात असत. महेंन्द्रादित्य कुमारगुप्त नंतर त्यांचा पुत्र बुद्धगुप्त सिंहासनावर आरूढ झाला आणि त्यानेही आपल्या पित्याने बांधलेल्या संघारामाच्या दक्षिण दिशेला दुसरा संघाराम बांधला. त्यानंतर बुद्धगुप्तचा मुलगा तथागत गुप्त यांने तिसरा संघाराम पूर्वेस बांधला यांनतर नरसिंहगुप्त (बालदित्य) गादीवर बसला आणि त्यांने उत्तर - पूर्व दिशेला चवथा संघाराम बांधला.
बालदित्यांनी चवथा संघाराम बांधल्यानंतर त्याने फार मोठा समारंभ घेतला आणि त्या समारंभाकरीता अनेक दूर-दूरच्या भिक्खूना आमंत्रित केले तसेच दोन चिनी भिक्खू सुद्धा समारंभात भाग घेण्यासाठी आले होते. यानंतर बालदित्य यांने चिवर परीधान केले होते. बालदित्य श्रामणेर झाल्यानंतर त्यांचा पुत्र वज्रादित्य सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्यांनी पश्चिम दिशेला आणि महेन्द्रादित्य कुमार गुप्तने बांधलेल्या उत्तरेला पाचवा संघाराम वज्रादित्यानी बांधला आणि शेवटचा संघाराम महेन्द्रादित्य कुमार गुप्तने बांधलेल्या संघारामाच्या पश्चिमेला दक्षिणच्या एका राजाने सहावा संघाराम बांधला. असे एकूण सहा संघाराम नालंदा विद्यापीठात होते . तसेच विद्यापीठात ८० सभागृहे होती आणि सर्व विद्यापीठ परिसराला प्रांगण भिंत होती आणि संघारामाच्या केंद्रस्थानी विद्यापीठ होते.
ह्यू - एन - त्संगच्या प्रवासवर्णावरून संघाराम आणि संघाच्या आसपास अनेक पवित्र स्थळे होती.
एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे इत्सिंग हा चिनी प्रवासी सातव्या शतकात भारतात आले होते. तेव्हा त्यांने सुद्धा बौद्ध धम्माचे शिक्षण या नालंदा विद्यापीठातूनच घेतलेले होते. इत्सिंगच्या सोबतच्या सहपाठीया मध्ये शांतरक्षित यांच्यासारखे विद्वान होते, इत्सिंगने 'रत्नोदधि' ग्रंथ संग्रहालयातून ४०० संस्कृत ग्रंथाचा चिनी भाषेत अनुवाद करून ते आपल्या देशात गेले. त्याच प्रकारे गौरवाची गोष्ट म्हणजे नालंदा विद्यापीठातील अनेक 'हस्तलिखित ग्रंथ' केंब्रिज व लंडनच्या ग्रंथ संग्रहालयात प्राप्त झाले आहेत.
नालंदा विद्यापीठात अध्ययन करण्यासाठी येणारे विद्यार्थी तीन प्रकारात मोडले जात होते. त्यात पहिला भिक्खू भिक्खूना बौद्ध धर्मग्रंथाचा व तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागत असे. दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी ब्रह्मचारी ब्रह्मचारी विद्यार्थ्यांना सर्व परित्याग करून ते धार्मिक व ऐहीक वाङ्मयांचा अभ्यास करू शकत होते. तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी हे मानवक असत, मानवक यांना बौद्ध धर्म ग्रंथांचे शिक्षण दिले जात होते. परंतु मिक्षू होण्याकरीता त्यांच्यावर सक्ती होत नव्हती ब्रह्मचारी व मानवक या दोन्ही प्रकारातील विद्यार्थ्यांना मात्र विहारात राहण्याची परवानगी होती, परंतु खर्च मात्र स्वतः करावा लागत असे तसेच विहारात शिस्त न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षाही होत असे आणि विहारातील विद्यार्थ्यांना विद्वानांच्या सभातून आपले ज्ञान, तसेच आविष्कारशक्ती सिद्ध करून दाखवावी लागत असे.
इत्सिंग आपल्या प्रवासवर्णनात म्हणतात की, “वादविवाद अथवा शास्त्रार्थ ही नालंदातील प्रमुख शिक्षण पद्धती होती ”.
ह्यू - एन - त्संग जेव्हा नालंदा विद्यापीठात गेले तेव्हा नालंदाच्या लोकांनी ह्यू - एन - त्संगचे मोठ्या आदराने स्वागत केले होते. ह्यू - एन - त्संग यांच्या स्वागताचे वर्णन असे की, २०० भिक्खू व एक हजार बौद्ध धर्मीय लोक ( जनता ) हातात पताका, आतपत्रे, सुगंधी द्रव्ये व फुले इ. घेवून मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यासाठी सारी जनता नगराबाहेर आली होती. जेव्हा ही मिरवणुक नगर द्वारपाशी पोहचली तेव्हा मठातील अखिल भिक्खूगण त्यात सामील झाले." अभिवादन समारंभ" संपल्यानंतर अधिपतीच्या व्यासपीठावर एक खास आसन ठेवण्यात आले होते व त्यावर बसविण्या संदर्भात धर्मनायकाला विनंती करण्यात आली. यानंतर सर्व भिक्खू व सामान्यलोक आपापल्या ठिकाणी असल्यावर, ह्यू - एन - त्संग यांनी मठात वास करावा व मठातील भिक्खूची सर्व भांडी व सामान यांचा उपयोग करावा आणि त्याला उपाध्याक्षाने घंटानाद करून जाहीर विनंती करावी, असे सांगण्यात आले, स्वागत समारंभ संपल्यानंतर या विशाल विहाराचा अधिपती 'शिलभद्र यांना' धर्मनिधी' या नांवानेही संबोधित होते. ह्यू - एन - गंगचा मार्गदर्शक त्याला जेथे शिलभद्र बसले होते तेथे घेऊन गेले. शिलभद्राच्या समोर येताच ज्याप्रमाणे शिष्य गुरूला अभिवादन करतात त्याचप्रमाणे ह्यू - एन - त्संगने त्यांना (शिलभद्राला) अभिवादन करून त्यांचा सत्कार केला. ह्यू - एन - त्संगला शिलभद्राने त्यांच्या प्रवासाबद्दल व प्रकृतीबद्दल कुशल प्रश्न विचाराल्यानंतर शिलभद्राने ह्यू - एन - त्संग आणि त्यांचा बरोबरच्या भिक्खूकरिता आसने मागविली व त्यावर आसनस्थ होण्याकरीता त्यांना विनंती केली. मंडळी आसनस्थ झाल्यावर भारतात येण्याचे ह्यू - एन - त्संगचे काय उद्देश आहे ? या बद्दल पृच्छा केली. ह्यू - एन - त्संगने उत्तर दिले की “मी चीनहून विज्ञानवादाचा अभ्यास करण्यासाठी येथे आलो आहे.” ह्यू - एन - त्संगच्या मुखातून या प्रकारचे उत्तर बाहेर पडताच शिलभद्राच्या डोळ्यातून अश्रुचा प्रवाह सुरू झाला. ह्यू - एन - त्संगच्या आगमनाबद्दल शिलभद्र यांना पूर्वबोध झाला होता. ह्याचे सविस्तर वर्णन करण्याकरीता शिलभद्रांनी भिक्खूना आज्ञा केली. ह्यू एन - त्संगाने शिलभद्राच्या पूर्वबोधाचे भिक्षूंकडून वर्णन ऐकल्यानंतर ते म्हणाले की, “ज्याअर्थी माझे आगमन आपल्या स्वप्नाप्रमाणे झाले आहे. त्याअर्थी हे कृपानिधे, मला धर्म विद्या देवून ज्ञानमृत पाजा व स्वामीनिष्ठ नम्र सेवकाप्रमाणे आपली मनोभावे सेवा करण्याची संधी द्या.
वरिल सर्व चर्चा संपल्यानंतर ह्यू - एन - त्संगची बालदित्य राज्याच्या विहारात बुद्धभद्राबरोबर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्या विहारा ह्यू - एन - त्संगची राहण्याची व्यवस्था केली ते विहार चार मजली होते. या विहारात सात दिवस राहील्यानंतर ह्यू - एन - त्संग बोधीसत्व धर्मपालांच्या एन - त्संगने नालंदाचे शेजारी राहावयास गेले.
ह्यू - एन - त्संगने नालंदाचे कुलपती शिलभद्र यांचे जवळ शिक्षण घेण्याची जिज्ञासा प्रकट केली तेव्हा, शिलभद्राने ह्यू - एन - त्संगला प्रथम “सुर जयसेन” या एका क्षत्रिय विद्वानाकडे 'योगदर्शन' आणि 'न्यायदर्शन' या शिक्षणाकरीता पाठविले. सुरथ जयसेन हा दर्शन व शब्द शास्त्राचा महान विद्वान होता. जयसेनने बोधीसत्व स्थिरमती यांच्याकडून शब्द विद्येचे शिक्षण घेतले होते. सुरथ जयसेन यांनी अनेक महान पंडीताकडून अध्ययन समाप्त केल्यानंतर त्यांनी नालंदा विद्यापीठात प्रवेश केला होता. आणि महान विद्वान कुलपती शिलभद्र यांचे कडून बौद्ध ग्रंथाचे अध्ययन केले होते. जेव्हा ह्यू - एन - त्संग आपल्या गुरूसोबत बुद्धगयाचे महाबोधी विहाराचा उत्सव पाहण्याकरीता गेले होते , तेव्हा त्यांनी तेथे भगवान बुद्धाच्या पवित्र धांतूना सूर्य प्रकाशाप्रमाणे तेजस्वी स्वरूपात पाहिले होते.
संदर्भ: प्राचीन भारतातील प्रमुख बौद्ध विद्यापीठे
डॉ.माणिक गजभिये