Monday, 1 May 2023

बौध्दांनी जनगणनेत काय लिहायचे...!

 जनगणनेत बौध्दांनी जात महार व धर्म बौद्ध लिहणे गरजे आहे, जर जनगणनेत जात बौद्ध आणि धर्म सुद्धा बौद्ध लिहण्याचा विचार करत असाल तर ते पुर्णपणे चुकीचे ठरते, कारण जातीचा रकाना केवळ जात लिहण्यासाठीच बनवला आहे, त्यामधे धर्म लिहण्याची परवानगी नाही, आणि जर जातीच्या रकान्यात कास्ट सर्टिफिकेट पाहुन जात बौद्ध लिहले तरी सुद्धा ते चुकीचे आहे, कारण बरेच कास्ट हे चुकीचे नावाने दिलेले आहेत, काही कास्ट असलेले नमुने १)बौद्ध २)नवबौद्ध ३)बोध्द ४)बुद्ध ५)महार, हे एवढे नाव एका जातीचे असु शकतात का काय असेल एवढ्या नावचे कास्ट एकाच जातीमधे असणे,  याचे कारण समाजात अतिशहाणे लोकं खुप आहेत, गांजर कोणतं आणि मुळा कोणता काही ढेकळं माहिती नसते पण मी सांगतो तेच खरं असी व्रूत्ती काही लोकांमधे आहे त्यामुळे हे एकाच जातीचे कास्ट पाच नावाने निघते, 

                 बरं कास्ट निघते त्यावर आरक्षण ही मिळते पण हे सवलती घेण्यापर्यंत ठिक आहे, पुढे जनगणन येणार जनगणना होणार या पाच नावापैकी एकच जात जातीच्या रकान्यासाठी परफेक्ट आहे ती म्हणजे महार कारण या पाच नावापैकी फक्त महार नावाची जातच भारतात आहे बाकीच फालतुपणा आहे, 

                बौद्ध नावाची जात भारतात कोठेही अस्तित्वात नाही तर तो फक्त धर्म आहे, आणि धर्म जातीच्या रकान्यात लिहायला परवानगी नाही, 

     ............काही महाभाग याच्या ही पुढे जातात आणि म्हणतात आम्ही जातीचा रकाना रिकामा ठेवू.

          का रिकामा ठेवायचा तर जात महार लिहायची नाही म्हणून. जात महार लिहली तर धर्म हिंदू होईल अशी खुप मोठी अंधश्रद्धा डोक्यात घर करुन बसलेली आहे, 

    तर सर्वप्रथम जात महार लिहली म्हणून धर्म हिंदू होतो ही अंधश्रद्धा डोक्यातुन काढुन टाका 

               अनुसुचित जाती प्रवर्ग हा फक्त आणि फक्त जातींसाठीच बनलेला आहे त्याचा कोणत्याही धर्माशी तिळमात्र संबंध नाही, कारण अनुसूचित जाती प्रवर्गात तीन ते चार धर्मातील जाती येतात, मुस्लीम, शिख जैन या धर्मातील जाती सुद्धा sc मधे येतात, फक्त हिंदू धर्मासाठीच हा प्रवर्ग नाही हे लक्षात घेतले पाहिजे, त्या साठी जात महार आणि धर्म बौध्द हे गरजेचे आहे, कारण 

Sc प्रवर्गात फक्त महार जातींची लोकसंख्या गणल्या जाईल बाकीच्यांनी जे बौध्द नवबौध्द टाकले आहे ते एस सी प्रवर्गात मोजले जाणार नाही, परीणामी 13% sc लोकांपैकी 60 लाख बौध्दांची गणना होणारच नाही आणि त्याचे परिणाम असे एस.सी. प्रवर्गाची लोकसंख्या 13% भरणार नाही व एस.सी. मिळणारे 13% आरहण हे 13% वरुन कमी होईल, म्हणजे ते 6ते 7 टक्क्यांपर्यंत खाली येईल .

        

          काही शासकीय दस्तावेज आणि सविस्तर माहीतीचे पाँम्पलेटस खाली दिले आहे माहीती साठी